PMKISAN संबंधित दुरुस्ती करण्याच्या सुविधा आता सर्व सेतू केंद्रांवर

PMKISAN संबंधित दुरुस्ती करण्याच्या सुविधा आता सर्व सेतू केंद्रांवर देण्यात आलेल्या आहेत.









Share:

प्रधानमंत्री पिक विमा योजनेत सहभागासाठी 31 डिसेंबर पर्यंत मुदत

प्रधानमंत्री पिक विमा योजनेत सहभागासाठी 31 डिसेंबर पर्यंत मुदत
• 360 रुपयात मिळणार 24 हजार रुपयांचे पीक विमा संरक्षण
• जोखीम टाळण्यासाठी जिल्ह्यातील अधिकाधिक शेतकऱ्यांनी सहभागी होण्याचे आवाहन
 जळगाव, दि. 30 - रब्बी हंगाम 2019-20 मध्ये अधिसुचित पीकासाठी प्रधानमंत्री पिक विमा योजना राबविण्यात येत आहे. या योजनेत शेतकऱ्यांना सहभागी होण्यासाठी 31 डिसेंबर, 2019 पर्यंत अंतिम मुदत आहे. रब्बी हंगाम घेणाऱ्या शेतकऱ्यांना नैसर्गिक आपत्ती, किड आणि रोगासारख्या अकल्पित प्रतिकूल परिस्थितीमुळे पिकांचे नुकसान झाल्यास शेतकऱ्यांना विमा संरक्षण देणे आणि पिकांच्या नुकसानीच्या अत्यंत कठीण परिस्थितीतही शेतकऱ्यांचे आर्थिक स्थैर्य अबाधित राखणे. हा  शेतकरी हिताचा उद्देश डोळ्यासमोर ठेवून रब्बी हंगाम 2019-2020 मध्ये जिल्ह्यात प्रधानमंत्री पिक विमा योजना अधिसूचित क्षेत्रातील अधिसूचित पिकांसाठी विमा क्षेत्र घटक धरून (Area Approach) राबविण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे.
प्रधानमंत्री पिक विमा योजनेची वैशिष्ट्ये- ही योजना कर्जदार शेतकऱ्यांना बंधनकारक असून बिगर कर्जदार शेतकऱ्यांना एैच्छिक आहे. नुकसान भरपाई कृषि आयुक्तालयामार्फत पिक उत्पादनाच्या अंदाजासाठी घेतलेल्या पिक कापणी प्रयोगाच्या उत्पादकतेच्या सरासरी आकडेवारीवर आधारित असेल. जोखीमस्तर सर्व पिकांसाठी 70 टक्के असा निश्चित करण्यात आला आहे.
जोखमीच्या बाबी-अपूरा पाऊस, हवामानातील इतर घटकांच्या प्रतिकुल परिस्थितीमुळे केवळ अधिसुचित मुख्य पिकांची अधिसुचित क्षेत्रात व्यापक प्रमाणावर पेरणी/लावणी होवू न शकलेल्या क्षेत्रासाठी पेरणी/लावणी न झालेले क्षेत्र हे सर्वसाधारण क्षेत्राच्या 75 टक्के पेक्षा जास्त असल्यास विमा संरक्षण देय राहिल. दुष्काळ, पावसातील खंड, पुर, क्षेत्र जलमय होणे, कीड व रोगांचा व्यापक प्रादुर्भाव, भूस्खलन, नैसर्गिक आग, वीज कासळणे, चक्रीवादळ आणि गारपीट या टाळता न येण्यायोग्य जोखमींमुळे पिके पेरणीपासून काढणीपर्यंतच्या कालावधीत पिकांच्या उत्पन्नात येणाऱ्या घटीपासून व्यापक विमा संरक्षण देय राहिल.
पिकनिहाय विमा हप्ता दर व विमा सरक्षित रक्कम- सर्व अन्नधान्य व गळीत धान्य पिकांसाठी संरक्षित रकमेच्या 1.5 टक्के दराने आणि कांदा पिकासाठी संरक्षित रकमेच्या 5 टक्के दराने विमा हप्ता आकारला जाईल. पिके, जोखीमस्तर (टक्केवारीत), विमा संरक्षित रक्कम (रुपयात), शेतकऱ्याने भरावयाची विमा हप्ता रक्कम अनुक्रमे अशाप्रकारे आहेत. प्रत्येक पिकाचा जोखीमस्तर 70 टक्के इतका राहिल. गहू, बाजरी- विमा संरक्षित रक्कम रुपये 33 हजार, शेतकऱ्यांने भरावयाची विमा हप्ता रक्कम रुपये 450/-, ज्वारी,बाजरी- विमा संरक्षित रक्कम 24 हजार रुपये, शेतकऱ्याने भरावयाची विमा हप्ता रक्कम रुपये 360/-, ज्वारी जिरायत- विमा संरक्षित रक्कम रुपये 24 हजार, शेतकऱ्याने भरावयाची विमा हप्ता रक्कम रुपये 360/-, हरभरा- विमा संरक्षित रक्कम रुपये 24 हजार, शेतकऱ्याने भरावयाची विमा हप्ता रक्कम रक्कम रुपये 360/-, भुईमुग- विमा संरक्षित रक्कम रुपये 35 हजार, शेतकऱ्याने भरावयाची विमा हप्ता रक्कम रुपये 525/-, कांदा- विमा संरक्षित रक्कम रुपये 52 हजार, शेतकऱ्याने भरावयाची रक्कम रुपये 2600/- अशाप्रकारे आकारणी करण्यात येईल.
रब्बी हंगाम 2019-2020 अंतर्गत प्रधानमंत्री पीक विमा योजनेंमध्ये अधिसुचित क्षेत्रातील अधिसुचित पिकांसाठी बिगर कर्जदार शेतकऱ्यांनी सहभागी होण्यासाठी जवळच्या बँकेत, आपले सरकार सेवा केंद्र, जिल्हा मध्यवर्ती बँकेशी संपर्क साधून सहभाग नोदवावा. अथवा www.pmfby.gov.in या संकेतस्थळावर स्वत: सहभाग नोदविण्याची सुविधा आहे. कर्जदार शेतकऱ्यांचा हप्ता संबंधित बँकेद्वारे भरला जाऊन सहभाग नोदविला जातो. विमा हप्ता भरण्यापूर्वी आपले शिवार ज्या महसूल मंडळात आहे, त्या महसूल मंडळाचा योजनेंतर्गत समावेश असल्याबाबतची खात्री केल्यावरच विमा हप्ता भरावा. अधिक माहितीसाठी नजिकच्या जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक शाखा, राष्ट्रीयकृत बँक शाखा, आपले सरकार सेवा केंद्र, तालुका कृषि अधिकारी कार्यालय, उपविभागीय कृषि अधिकारी कार्यालय, जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी, जळगाव यांचे कार्यालयाशी संपर्क साधावा. असे आवाहन संभाजी ठाकूर, जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी, जळगाव यांनी एका प्रसिद्धी पत्रकान्वये केले आहे.
000
Share:

चोपडा-धरणगाव-जळगाव वाहतूक मार्गात आजपासून बदल

चोपडा-धरणगाव-जळगाव वाहतूक मार्गात आजपासून बदल
पर्यायी मार्गाने वाहतुक करण्याचे जिल्हा पोलीस अधीक्षकांचे आवाहन
जळगाव, दि. 30 - मेहेरगाव-धुळे-अमळनेर-चोपडा-खरगोन रस्ता राज्यमार्ग-15 कि.मी 86/500 मधील निमगव्हाण जवळील तापी नदी पुलाचे दुरूस्तीचे काम राज्य शासनामार्फत करण्यात येत आहे. या कामाचा ठेका मे. सॅनफिल्ड इंडिया लिमीटेड, भोपाळ या कंपनीला देण्यात आलेला आहे. पुलाच्या जुन्या बिअरींग बसविणे, नवीन एक्सापान्शन जॉइंट बसविणे आदि बाबींचा समावेश आहे. या कामाची व्याप्ती पाहता प्रत्यक्षात काम करताना पुलाचे गर्डर उचलून नवीन बिअरिंग बसविणे प्रस्तावित असल्याने पुलावरील वाहतुक कमीत कमी एक महिना बंद करणे आवश्यक आहे. तसेच पुलाच्या शेजारुन पर्यायी मार्ग बनविणे अशक्य आहे. त्यामुळे या रस्त्यावरील वाहतुक पर्यायी मार्गावरून कळविणे आवश्यक आहे.
वाहनांच्या विनियमनासाठी आणि कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी चोपडा ते जळगाव (धरणगाव मार्गे), चोपडा ते अमळनेर, चोपडा ते धरणगाव या तीन्ही मार्गावरून येणारी व जाणारी सर्व प्रकारच्या वाहतुकीस रविवार, 1 डिसेंबर ते 30 डिसेंबर, 2019 पावेतो सर्व प्रकारची वाहतुक बंद करून पर्यायी मार्गाने वाहतुक वळविण्यात येत आहे.
चोपडा ते जळगाव (धरणगाव मार्गे) होणाऱ्या वाहतुकीकरीता नागरीकांनी पर्यायी मार्ग चोपड, अडावद, धानोरा मार्ग जळगाव या मार्गाचा येण्यासाठी व जाण्यासाठी वापर करावा. चोपडा ते अमळनेर दरम्यान होणाऱ्या वाहतुकीकरीता नागरीकांनी चोपडा, हातेड बु. मार्गे तसेच अमळगाव, जळोद मार्गे या पर्यायी मार्गाचा येण्यासठी व जाण्यासाठी वापर करावा, चोपडा ते धरणगाव दरम्यानच्या होणाऱ्या वाहतुकीसाठी नागरीकांनी चोपडा, जळोद, अमळगाव, नांद्री, पातोंडा तसेच चोपडा, हातेड, जळोद, नांद्री, पातोंडा मार्गे या पर्यायी मार्गाचा येण्यासाठी व जाण्यासाठी वापर करावा. या मार्गावरुन प्रवास करणाऱ्या सर्व नागरिकांनी याची नोंद घ्यावी व प्रशासनास सहकार्य करावे. असे आवाहन जिल्हा पोलीस अधिक्षक डॉ. पंजाबराव उगले यांनी एका प्रसिध्दी पत्रकान्वये केले आहे.
000
Share:

प्रधानमंत्री कृषी सन्मान योजनेच्या लाभासाठी आधारकार्ड जोडण्याकरीता 30 नोव्हेंबरपर्यंत मुदत


जळगाव, दि. 23 :- जळगाव जिल्ह्यात प्रधानमंत्री कृषी सन्मान योजना फेब्रुवारी, 2019 पासुन राबविण्यात येत आहे. शासनाकडून आलेल्या मार्गदर्शक सुचनांप्रमाणे प्रधानमंत्री कृषी सन्मान योजनेसाठी (PM-KISAN) सर्व शेतकरी कुटूंबाची माहिती PM-KISAN पोर्टलवर अपलोड करण्यात आली आहे. त्यापैकी पात्र शेतकरी लाभार्थ्यांना सदर योजनेचा तीन टप्पयात लाभ प्राप्त झालेला आहे. 
  शासनाकडून आलेल्या मार्गदर्शक सुचनांप्रमाणे चौथ्या टप्प्यापासून लाभ देतांना पात्र लाभार्थी शेतकऱ्यांचे    PM-KISAN पोर्टवरील नांव व आधार कार्डवरील नाव सारखे असणे अनिवार्य आहे. जळगाव जिल्ह्यातील एकुण नोंदणी झालेल्या 3 लाख 91 हजार 466 लाभार्थ्यांपैकी 1 लाख 31 हजार 834 इतक्या लाभार्थ्यांचे नांव आधार कार्डप्रमाणे PM-KISAN पोर्टलवर नाही. यासाठी पात्र लाभार्थी शेतकरी यांनी शासनाच्या www.pmkisan.gov.in या संकेतस्थळावरील Farmers Corner या लिंकमध्ये जाऊन Edit Aadhar Failure Record मध्ये आपला आधार क्रमांक टाकावा. जर लाभार्थ्यांचे नाव आधारकार्ड प्रमाणे बरोबर असेल तर Record not found for correction or It has corrected असा संदेश येईल. म्हणजेच त्या लाभार्थ्यांचे नांव आधार कार्ड प्रमाणे बरोबर आहे. 
  जर आधार कार्डवरील नाव आणि PM-KISAN पोर्टवरील नावात तफावत असेल तर सदर नांव Edit (दुरुस्ती) करणेसाठी उपलब्ध होईल. नंतर लाभार्थी यांना आपल्या आधार कार्डवरील नावाप्रमाणेच (Spelling/Space/Small/Capital Letter इ. जसे आहे तसेच) Farmer Name Update करणे आवश्यक आहे. सदर दुरुस्ती स्वत: लाभार्थी यांना किंवा माहितीगार व्यक्तीकडून करता येईल. लाभार्थी यांना मोबाईलचा वापर करुन सुद्धा आपले नांव Update करता येईल. 
  याशिवाय सदर कामासाठी आपल्या गावाचे तलाठी यांचेकडे ज्या नांवाची दुरुस्ती करावयाची आहे. अशा यादी पुरविण्यात आली असून लाभार्थी हे त्यांचे नावाची दुरुस्ती तलाठी यांचेमार्फत सुद्धा करुन घेऊ शकतात. PM-KISAN पोर्टलवरील नांव आधार कार्ड प्रमाणे अद्ययावत करणेबाबतची कार्यवाही 30 नोव्हेंबर, 2019 पर्यंतच करावयाची आहे. तसेच सदर नाव Update करणेबाबतची सुविधा PM-KISAN पोर्टलवर निशुल्क उपलब्ध आहे. असे जिल्हाधिकारी डॉ. अविनाश ढाकणे यांना प्रसिद्धी पत्रकान्वये कळविले आहे. 
000
Share:

स्थळ निरीक्षण : वसुली आढावा






आज पाळधी बु.व पोखरी परिसरातील स्टोन क्रेशर, खाणपट्टा संदर्भातील रॉयल्टी भरणा बाबत मा. तहसिलदार धरणगाव श्री. नितीन देवरे साहेब ,तलाठी बालाजी लोंढे तसेच कोतवाल राहुल शिरोळे यांनी प्रत्यक्ष खाणपट्ट्यावर जाऊन  पहाणी केली. यावेळी संबंधित मालकांना त्यांच्याकडील थकीत रकमेचा लवकरात लवकर भरणा करण्याचे आवाहन करण्यात आले. यावेळी अनधिकृत बिनशेती वापराबाबत प्रकरणे शोधण्यात आली. याबाबत संबंधित मालकांवर योग्य ती कायदेशीर कार्यवाही करण्यात येईल.
Share:

प्रभाग निहाय आरक्षण (ग्रा.प. पोखरी) : अधिसूचना



वरील नमुना मधील नोटीस चावडीवर प्रसिद्ध  आली असून या संदर्भात कोणतीही हरकत असल्यास मा. तहसीलदार, धरणगाव यांच्याकडे दि.26/11/2019 पर्यंत हरकत घ्यावी असे सर्व पोखरी तांडा मधील ग्रामस्थांना कळविण्यात येत आहे.

Share:

पोखरी येथे प्रभागनिहाय आरक्षण सोडत : ग्रामसभा संपन्न



 मौजे पोखरी येथे प्रभागनिहाय आरक्षण सोडत काढण्यासाठी आज दि.18/11/2019 रोजी सकाळी 10.30 वाजता बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. 

अंगणवाडीच्या इमारतीमध्ये सदरची सभा आयोजित करण्यात आली होती. या सभेस प्राधिकृत अधिकारी श्री.बिऱ्हाडे मं.अ.साळवा भाग, श्री.प्रकाश बाविस्कर मं.अ.सोनवद भाग, श्री.बालाजी लोंढे तलाठी पोखरी, सरपंच मंगल पाटील, श्री.श्याम पाटील प्रभारी ग्रामसेवक पोखरी, कोतवाल, पोलीस पाटील, ग्रामपंचायत शिपाई तसेच पोखरी व तांडा मधील नागरिक बहुसंख्येने उपस्थित होते.
यावेळी प्रथम प्राधिकृत अधिकारी श्री.बिऱ्हाडे यांनी सभा बोलविण्याबाबत प्रास्ताविक केले. त्यानंतर तलाठी बालाजी लोंढे यांनी प्रभाग निहाय विस्तार कसा आहे याबाबत स्पष्टीकरण केले. तदनंतर प्रभागनिहाय आरक्षण सोडत काढण्यात आली. यावेळी गावातील लहान बालक व बालीकेच्या हस्ते चिठ्ठया टाकून आरक्षण सोडत काढण्यात आली. प्रभागनिहाय आरक्षणाबाबत श्री.बिऱ्हाडे व श्री.बाविस्कर यांनी नागरिकांना मार्गदर्शन केले. यावेळी प्राधिकृत अधिकारी श्री.बिऱ्हाडे व श्री.बाविस्कर यांनी नागरिकांना आरक्षण सोडत समावून सांगीतली
व त्यांच्या प्रश्नांचे अभ्यासपूर्वक उत्तर देवून समाधान केले.
सदर सभेच्या यशस्वीतेसाठी स्थानिक पोलीस पाटील, ग्रामपंचायत शिपाई, कोतवाल व नागरिकांनी मोलाचे सहकार्य लाभले. त्यानंतर मौजे एकलग्न बु.येथे प्रभागनिहाय आरक्षण सोडत काढण्यासाठी सभा घेण्यात आली.














Share:

59 व्या राज्य हौशी नाट्य स्पर्धेला सुरुवात


हौशी रंगकर्मींसाठी महाराष्ट्र शासनाची 58 वर्षांची परंपरा असलेली स्पर्धा
  जळगाव, दि. 11 - राज्यातील 19 केंद्रावर हौशी रंगकर्मींसाठी आयोजित होणारी राज्य नाट्य स्पर्धा आजही आपले वलय टिकवून आहे. महाराष्ट्र शासनाच्या सांस्कृतिक कार्य संचालनातर्फे आयोजित होणार्‍या 59 व्या राज्य नाट्य स्पर्धेची जळगाव केंद्रावरील प्राथमिक फेरी छत्रपती संभाजीराजे नाट्यगृहात दि. 15 नोव्हेंबर ते 5 डिसेंबर, 2019 दरम्यान आयोजित करण्यात आली आहे.  सांस्कृतिक कार्य संचालनालय मराठी रंगभूमी समृध्द करण्याकरिता या स्पर्धांचे आयोजन करीत असते. स्पर्धेची गौरवसंपन्न अशी 58 वर्षे पूर्ण झाली आहेत. आजवरच्या स्पर्धांतून नवनवीन प्रयोग करून मराठी रंगभूमीस समृध्द करुन वैश्‍विक स्तरावर नेणारे अनेक नाटककार, अभिनेते, तंत्रज्ञ व दिग्दर्शक मराठी रंगभूमीला लाभले आहे. मराठी रंगभूमी अजून सृजनशील, क्रियाशील व तेजस्वी करण्यासाठी राज्यभरातील 19 केंद्रावर या स्पर्धेची प्राथमिक फेरी आयोजित करण्यात येते. यंदा जळगाव केंद्रावरील प्राथमिक फेरी दि. 15 नोव्हेंबर ते 5 डिसेंबर दरम्यान शहरातील छत्रपती  संभाजीराजे नाट्यगृहात सायं. 7 वाजता होणार आहेत.   जळगाव केंद्रावर 21 दिवस ही स्पर्धा सुरु राहणार असून, 15 नोव्हेंबर रोजी उत्कर्ष कलाविष्कार भुसावळतर्फे राहुल बनसोडे लिखीत, अनिल कोष्टी दिग्दर्शित आर्टिफिशिअल इंजेलिजन्स, 16 नोव्हेंबरला सुबोध बहु. युवा प्रतिष्ठान जळगावतर्फे रुपाली गुंगे लिखीत राज गुंगे दिग्दर्शित जतरा, दि. 17 नोव्हेंबर रोजी लोकमंगल कलाविष्कार सह.संस्था धुळेतर्फे निळकंठ महाजन लिखीत, सुजय भालेराव दिग्दर्शित उजेड विकणारी बाई, 18 नोव्हेंबरला मध्यप्रदेश मराठी अकादमी इंदौर यांचे अमोल रेडीज लिखीत, पंकज वागळे दिग्दर्शित जिहाद, 19 नोव्हेंबर रोजी नाट्यभारती इंदौर यांचे ऋषिकेश वैद्य लिखीत, अमोल दामले अनुवादीत श्रीराम जोग दिग्दर्शित मॉर्फोसिस, दि. 20 नोव्हेंबर भारतीय साहित्य सांस्कृतिक कला विकास मंच भुसावळ यांचे वैभव भंडारी लिखीत, संजय तारांबळे दिग्दर्शित पंचम, दि. 21 नोव्हेंबरला नूतन मराठा महाविद्यालयाचे हनुमान सुरवसे लिखीत दिग्दर्शित बुजगावन, दि.22 नोव्हेंबरला समर्थ बहु. संस्था जवखेडे यांचे विठ्ठल सावंत लिखीत, विशाल जाधव दिग्दर्शित अर्जुन की अभिमन्यू, दि. 23 नोव्हेंबर रोजी जय गणेश फाऊंडेशन भुसावळ तर्फे विरेंद्र पाटील लिखीत दिग्दर्शित झेंडूचं फुल, दि. 24 नोव्हेंबर जननायक थिएटर ग्रुप जळगावतर्फे सोनल चौधरी लिखीत दिग्दर्शित 2048, दि. 25 नोव्हेंबर रोजी केअर टेकर फाऊंडेशन जळगाव यांचे रमेश भोळे लिखीत दिग्दर्शित विश्‍वासघात, दि. 26 नोव्हेंबरला फ्लाईंग बर्ड फाऊंडेशन जळगाव यांचे आनंद प्रभू लिखीत, किरणकुमार अडकमोल दिग्दर्शित लग्न नको पण पप्पा आवर, दि. 27 नोव्हेंबर रोजी डॉ.अ.जी.जी.बेंडाळे महाविद्यालय, जळगाव यांचे रुपाली गुंगे लिखीत, अश्‍विनी भालकर दिग्दर्शित शकुंतला एक विरह, दि. 28 नोव्हेंबर रोजी कलवोब मल्टीपर्पज फाऊंडेशन यांचे सुरेश राघव लिखीत, आकाश बाविस्कर लिखीत मानसन्मान, 29 नोव्हेंबर रोजी इंदाई फाऊंडेशन, बदरखे, ता.पाचोरा यांचे शफाअत खान लिखीत, रमेश लिला दिग्दर्शित पोलीसनामा, दि. 30 नोव्हेंबर रोजी भुसावळ औष्णिक विद्युत केंद्र यांचे चंद्रकांत सपकाळे लिखीत, राजेश पवार दिग्दर्शित नव्या सूर्याची पहाट, दि. 1 डिसेंबर रोजी मूळजी जेठा महाविद्यालय, जळगाव यांचे श्रीपाद देशपांडे, हेमंत पाटील दिग्दर्शित इस्टमन कलर, दि. 2 डिसेंबर रोजी अविरत इंदौर यांचे अभिनय देशमुख लिखीत दिग्दर्शित मोस्ट वॉन्टेड मिलिंद, दि. 3 डिसेंबर रोजी  अष्टरंग इंदौर यांचे प्रशांत दळवी लिखीत, अनिल चापेकर दिग्दर्शित ध्यानीमनी, दि. 4 डिसेंबर रोजी अखिल भारतीय लेवा विकास महासंघ, जळगाव यांचे वैभव मावळे लिखीत दिग्दर्शित कोण नथुराम? मी गोखले विचारतोय तर स्पर्धेच्या शेवटच्या दिवशी दि. 5 डिसेंबर रोजी आप्पासाहेब विश्‍वासराव भालेराव प्रतिष्ठान जळगाव शरद भालेराव लिखीत, चिंतामण पाटील दिग्दर्शित हल्लाबोल ही नाटके सादर होणार आहेत.   शासकीय स्पर्धा असल्याने, तिकीट दर 15 व 10 रुपये असून, जास्तीत जास्त नाट्यरसिकांनी या नाट्यपर्वणीचा लाभ घ्यावा, असे आवाहन सांस्कृतिक कार्य संचालनालय महाराष्ट्र राज्याचे सचिव बिभीषण चवरे व जळगाव येथील राज्य नाट्य समन्वयिका सरिता खाचणे यांनी केले आहे.000


Share:
मोठी बातमी: राज्यपालांकडून शेतकऱ्यांना हेक्टरी ८००० रुपयांची मदत जाहीर


मोठी बातमी: राज्यपालांकडून शेतकऱ्यांना हेक्टरी ८००० रुपयांची मदत जाहीर
दोन हेक्टरपर्यंत जमीन असलेल्या शेतकऱ्यांना खरीप पिकांसाठी ही नुकसान भरपाई मिळेल.
मुंबई: परतीच्या पावसामुळे पिकांचे प्रचंड नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी काहीप्रमाणात दिलासा दिला आहे. राज्यपालांनी शनिवारी शेतकऱ्यांना प्रतिहेक्टर ८ हजार रुपयांची मदत देणार असल्याचे जाहीर केले. त्यानुसार दोन हेक्टरपर्यंत जमीन असलेल्या शेतकऱ्यांना खरीप पिकांसाठी ही नुकसान भरपाई मिळेल. तर फळबागा आणि बारमाही पिकांच्या नुकसानीसाठी हेक्टरी १८००० रुपये इतकी नुकसान भरपाई मिळणार असल्याचे राजभवनाकडून प्रसिद्ध करण्यात आलेल्या परिपत्रकात म्हटले आहे. याशिवाय, शेतसारा माफ केला जाणार आहे. तसेच ग्रामीण भागातील शाळा आणि महाविद्यालयातील विद्यार्थ्यांना परीक्षा शुल्कातून सूट देण्यात आली आहे
Share:

पोखरी ग्रामपंचायत प्रभागनिहाय आरक्षण सोडत

मोजे पोखरी येथे दि.18/11/2019 रोजी सकाळी 10.00 वाजता आरक्षण सोडत पद्धतीने प्रभाग नुसार आरक्षण ठरवण्यात येणार आहे. त्यासाठी सर्व नागरिकांनी सकाळी 10.00 वाजता मराठी शाळेजवळ हजर रहावे असे आवाहन प्राधिकृत अधिकारी श्री.बिऱ्हाडे मंडळ अधिकारी साळवा भाग, तलाठी बालाजी लोंढे तसेच ग्रामसेवक श्रीमती पाटील यांनी केले आहे.




Share:








जिल्ह्यात भरडधान्य नोंदणी व खरेदीकरीता 15 खरेदी केंद्र सुरु
  जळगाव, दि. 15 :- जिल्ह्यात खरीप पणन हंगाम 2019-20 मध्ये केंद्र शासनाच्या आधारभूत किंमत खरेदी योजने अंतर्गत भरडधान्य (ज्वारी, बाजरी व मका) खरेदीकरीता जिल्हाधिकारी डॉ. अविनाश ढाकणे यांनी बिगर आदिवासी क्षेत्रात 15 खरेदी केंद्रांना मंजुरी दिलेली आहे. सदरच्या खरेदी केंद्रावर शेतकऱ्यांनी खरेदीसाठी ऑनलाईन नोंद करावयाची आहे.
  त्याकरिता शेतकऱ्यांनी चालु वर्षाचा ऑनलाईन 7/12 उतारा, आधार कार्डची झेरॉक्स व बँक पासबुक किंवा कॅन्सल चेकची झेरॉक्स सादर करावयाची आहे. शेतकरी नोंदणी 1 नोव्हेंबर, 2019 पासून सुरु झालेली असून नोंदणी व खरेदीची अंतिम मुदत 31 डिसेंबर, 2019 पर्यंत आहे.
  सन 2019-20 च्या खरीप पणन हंगामात हायब्रीड ज्वारी रुपये 2550/- मालदांडी ज्वारी रु. 2570/-, बाजारी रु. 2000/- व मका रु. 1760/- असा हमीभाव शासनाने निश्चित केलेला असुन सदरचा हमीभाव हा एफ.ए.क्यु. दर्जाच्या धान्याकरिता आहे. ज्यामध्ये न डागाळलेला, स्वच्छ प्रतिचा व 14 टक्क्यापर्यंत आद्रता असलेला माल खरेदी करण्यात येईल.
   तरी जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी भरडधान्य खरेदीकरीता ऑनलाईन नोंदणी करावी. असे आवाहन श्री. परिमल साळुंखे, जिल्हा मार्केटिंग अधिकारी, जळगाव यांनी एका प्रसिद्धी पत्रकान्वये केले आहे.
00000
Share:

बुरशीयुक्त चारा जनावरांना खाऊ घालताना घ्यावयाची काळजी

बुरशीयुक्त चारा चुन्याची निवळी शिंपडून
त्याची कुट्टी करूनच  जनावरांना खाऊ घाला
   जिल्हा पशुसंवर्धन उपायुक्त
  जळगाव.दि.13, जिल्ह्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे मका,ज्वारी,सोयाबीन, सारख्या पिकांचा अकाली पावसामुळे  या पिंकांच्या बडब्यावर ॲस्परजिलस नायगर बुरशीची मोठ्या प्रमाणावर वाढ होते. अश प्रकारच्या बुरशीयुक्त कडब्यात ऑक्झॅलीक ॲसीडचे प्रमाण वाढलेले दिसते. तसेच अतिवृष्टीमुळे कपाशीत वाढणारे पाथरीसारखे बोंडाच्या फुलाचे/फुल गवतामध्ये सुद्धा ॲक्झालिक ॲसीडचे 18 टक्के प्रमाण जास्त असते  जनावरांना अशा प्रकारचा जारा खाऊ घातल्यास जनावरांच्या रक्तातील कल्शियम बरोबबर संयांग हाऊन कॅल्शियम ऑक्झॅलेटचे स्फटीक तयार होतात, त्यामुळे शरीरातील कॅल्शियमचे प्रमाण कमी हावून महत्वाचे अवयवाचे कार्य मंदावते किंवा थांबते व जनावरांचा मृत्यु होतो. विषबाधा ही गायी,म्हशी,शेळ्या व मेंढ्या इत्यादि जनावरांमध्ये बुरशीयुक्त चारा खाण्याचे प्रमाणावर अवलंबून असते.
  बुरशीयुक्त चारा खाल्याने बाधीत झालेल्या जनावरांमधील आजाराची लक्षणे अशी असतात सौम्य विषबाधा झाल्याची लक्षणे 1 ते 12 महिने सतत सुरशीयुक्त चाऱ्यांच्या संपर्कात असलेल्या जनावरांमध्ये आढळून येवून जनावरांध्ये भुक न मंदावणे, संडास पातळ होणे, जनावरांचे वजन कमी होणे तर लाळ गळणे , जनावरे अशक्त होवून थरथर होणे, पोट फुगणे, श्वासाच्छवास घेण्यासाइी त्रास होणे, अशा परिस्थितीत जनावरे डोके पोटावर ठेवतात,लघवी थेंब-थेंब याप्रमाणे होणे, जनावरांच्या मागील बाजूस जलयुक्त सुज येणे ,बध्दकोष्टता हे लक्षणे तीव्र विषबाधा लक्षणे दिसमन येतात व यामध्ये जनावरे दगावूसुध्दा शकतात.
  तरी पशुपालकांनी आपल्या जनावरांना बुरशीयुक्त चारा खाऊ घालण्यापूर्वी त्या  चाऱ्यावर चुन्याची निवळी शिंपडून वाळवून कुट्टी करूनच खाऊ घालावा, तथापि योग्य ती काळजी घेवूनसुध्दा जनावरांना बाधा झाल्यास नजिकच्या पशुसंवर्धन दवाखान्याशी संपर्क साधून आपले पशुधन सुरक्षित सुदृढ ठेवण्याचे आवाहन जिल्हा पशुसंवर्धन उपायुक्त,जळगाव यांनी एका प्रसिध्दी पत्रकान्वये केले आहे.
                                   ****
Share:

धोक्याची सूचना : गिरणा पाणी विसर्ग

🛑🛑धोक्याची सूचना🛑🛑

आज दि, 2।11।2019 सकाळी 6:45 वाजता गिरणा धरणातुन  52500 क्युसेस पाणी सोडण्यात आलेले आहे. पावसामुळे विसर्गात निरंतन वाढ होत आहे, गिरणा नदीत गिरणा, मन्याड व इतर नदी नाले असे एकूण 70000  क्युसेस पाणी येऊ शकते तरी नदी काठावरील नागरिकांनी सतर्क रहावे 

हेमंत पाटील
उपविभागीय अभियंता











Share:

मौजे पाळधी बु. येथे अतिवृष्टी बाधित नुकसानीची पहाणी करताना मा. उपविभागीय अधिकारी

  मौजे पाळधी बु. येथे आज दि.02/11/2019 रोजी मा.श्री. गोसावी सर उपविभागीय अधिकारी, एरंडोल भाग एरंडोल, नायब तहसीलदार श्री.मोहोड, तलाठी व कोतवाल यांनी अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या पिकांची पहाणी केली.
यावेळी ज्वारी, मका, सोयाबीन इ. पिकांचे खूप मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याचे पाहणीत दिसून आले आहे.





Share: