नागरीकांनी शिधापत्रिकेसाठी शासकीय फी व्यतिरिक्त रक्कम देवू नये .
नागरीकांनी शिधापत्रिकेसाठी शासकीय फी व्यतिरिक्त रक्कम देवू नये. -- जिल्हा पुरवठा अधिकाऱ्यांचे आवाहन
जळगाव, दि. 20 - नागरीकांना तहसीलस्तरावर नवीन पिवळी, केशरी व शुभ्र याप्रमाणे शिधापत्रिका पुरविण्यात येते. शिधापत्रिका मिळण्यासाठी शासकीय फी चे दर निश्चित करण्यात आले आहे. नागरीकांनी या फी व्यतिरिक्त कुणालाही कोणत्याही प्रकारची जादा रक्कम देण्याची आवश्यकता नाही. असे जिल्हा पुरवठा अधिकारी सुनील सुर्यवंशी यांनी प्रसिध्दी पत्रकान्वये कळविले आहे.
जिल्ह्यातील काही स्वस्त धान्य दुकानदार यांचेकडून अनधिकृतपणे दरमहा पैसे गोळा करुन त्यांची आर्थिक फसवणूक होत असल्याचा व पुरवठा शाखेशी संबंधित असलेले अधिकारी, कर्मचारी यांना पैसे न दिल्यास स्वस्त धान्य दुकानाचा परवाना रद्द होईल, अशी भिती दाखवून त्यांचेकडून मोठ्या प्रमाणात दरमहा अनाधिकृत पैसे गोळा करीत असल्याबाबतच्या तोंडी तक्रार प्राप्त होत आहेत.
त्यानुसार जिल्ह्यातील सर्व स्वस्त धान्य दुकानदार यांना कळविण्यात येते की, कोणत्याही स्वस्त धान्य दुकानाच्या तपासणीसाठी किंवा अहवाल पाठविण्यासाठी आपल्याकडे तपासणीसाठी येणाऱ्या कोणत्याही अधिकारी, कर्मचारी यांना पैसे देऊ नये. कोणी आपल्याकडे पैशांची मागणी केल्यास त्याची तक्रार तात्काळ लाचलुचपत प्रतिबंध विभाग (ए.सी.बी.) जिल्हा पुरवठा अधिकारी, जिल्हाधिकारी, जळगाव यांचेकडे करावी. तसेच वरिष्ठ अधिकारी यांचे नावाखाली दुकानदार यांचेकडून कोणी रक्कम गोळा करीत असल्यास अशा बेकायदेशीर कामाशी जिल्हा पुरवठा कार्यालयाचा काही एक संबंध नसल्याचेही श्री. सुर्यवंशी यांनी कळविले आहे.
जिल्हा पुरवठा कार्यालयाकडून सर्व तहसीलस्तरावर नवीन पिवळी, केशरी व शुभ्र याप्रमाणे रेशनकार्ड विनामुल्य पुरविण्यात येत आहे. त्याबाबत संबंधित शिधापत्रिकाधारकांना द्यावयाच्या शासकीय फीचा दर नविन शिधापत्रिका पिवळी - रुपये 10, केशरी- रुपये 20, शुभ्र-रुपये 50 आणि दुय्यम शिधापत्रिका पिवळी- रुपये 20, केशरी रुपये 40, शुभ्र रुपये 100 याप्रमाणे निश्चित करुन दिलेला आहे. तर प्रत्येक शिधापत्रिका मिळविण्यासाठी संबंधित विभागाकडे करावयाच्या छपील अर्जासाठी 2 रुपये या शासन निर्णयाद्वारे दर निश्चित करुन दिलेले आहे.
त्यानुसार जिल्ह्यातील सर्व पात्र शिधापत्रिकाधारकांनी, लाभार्थ्यांनी किंवा स्वस्त धान्य दुकानदार यांनी पुरवठा विभागातील कोणत्याही अधिकारी, कर्मचारी यांना रक्कम देण्याची आवश्यकता नसल्याचेही जिल्हा पुरवठा विभागातर्फे जनतेच्या हितासाठी जाहिर करण्यात येत असल्याचे श्री. सुर्यवंशी यांनी कळलिे आहे.
000
जिल्ह्यातील पंचायत समित्यांच्या सभापती पदाचे आरक्षण जाहिर
जळगाव, दि.13 - जिल्ह्यातील 15 पंचायत समित्यांच्या सभापती पदासाठी आरक्षण सोडत जिल्हाधिकारी कार्यालयातील नियोजन भवन सभागृहात जिल्हाधिकारी डॉ. नंदकुमार बेडसे यांच्या अध्यक्षतेखाली काढण्यात आली.
पंचायत समितीनिहाय आरक्षण
अशाप्रकारे जिल्ह्यातील एकूण 15 पंचायत समित्यांच्या सभापती पदासाठी अनुसूचित जाती (एससी)-01, अनुसूचित जमाती (एसटी)-03 पैकी 02 महिलांसाठी, नागरिकांचा मागास प्रवर्ग-04 पैकी महिलांसाठी 02, सर्वसाधारणासाठी 07 यापैकी महिलांसाठी 04.याप्रमाणे आरक्षित झाले आहेत.
याप्रसंगी उपजिल्हाधिकारी (महसूल) रविन्द्र भारदे, जिल्हाधिकारी कार्यालयातील ग्रामपंचायत विभागातील कर्मचारी, विविध राजकीय पक्षांचे पदाधिकारी, नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
पंचायत समितीनिहाय सभापती पदाची आरक्षणनिहाय सोडत जिल्हाधिकारी डॉ. नंदकुमार बेडसे यांच्या अध्यक्षतेखाली एका लहान मुलीच्या हस्ते चिठ्ठया काढून जाहीर करण्यात आले.
पंचायत समितीनिहाय आरक्षण
- बोदवड- अनुसूचित जाती (एससी),
- जामनेर-अनुसूचित जमाती (एसटी),
- पाचोरा-अनुसूचित जमाती (एसटी) महिलासाठी राखीव,
- पारोळा-अनुसूचित जमाती (एसटी) महिलासाठी राखीव,
- जळगाव-नागरिकांचा मागास प्रवर्ग,
- चाळीसगाव-नागरिकांचा मागास प्रवर्ग,
- यावल-नागरिकांचा मागास प्रवर्ग (महिला),
- भडगाव-नागरिकांचा मागास प्रवर्ग,
- भुसावळ-सर्वसाधारण (महिला),
- चोपडा-सर्वसाधारण (महिला),
- अमळनेर- सर्वसाधारण (महिला),
- एरंडोल-सर्वसाधारण (महिला),
- रावेर-सर्वसाधारण,
- धरणगाव-सर्वसाधारण,
- मुक्ताईनगर-सर्वसाधाण.
अशाप्रकारे जिल्ह्यातील एकूण 15 पंचायत समित्यांच्या सभापती पदासाठी अनुसूचित जाती (एससी)-01, अनुसूचित जमाती (एसटी)-03 पैकी 02 महिलांसाठी, नागरिकांचा मागास प्रवर्ग-04 पैकी महिलांसाठी 02, सर्वसाधारणासाठी 07 यापैकी महिलांसाठी 04.याप्रमाणे आरक्षित झाले आहेत.
पोखरी ग्रामपंचायत निवडणूक सरपंच पद आरक्षण सोडत
पोखरी ग्रामपंचायत निवडणूक सरपंच पद आरक्षण सोडत साठी दि.07 डिसेंबर 2019 रोजी सकाळी 10.30 वाजता तहसील कार्यालय धरणगाव येथे मा. नायब तहसिलदार श्री.प्रथमेश मोहोड यांच्या अध्यक्षतेखाली सभा आयोजित करण्यात आली होती. यावेळी धरणगाव तालुक्यातील पोखरी या नव्याने स्थापन झालेल्या ग्रामपंचायतीचे सरपंच पदाचे आरक्षण चिठ्ठी टाकून 'सर्वसाधारण' व 'सर्वसाधारण स्त्री' या प्रवर्गाकरीता दोन स्वतंत्र चिठ्ठया टाकून त्यापैकी एक चिठ्ठी एका लहान मुलाच्या हस्ते काढण्यात आली. त्यावेळी काढण्यात आलेल्या चिठ्ठीत 'सर्वसाधारण' असे आरक्षण निघाले.
'सर्वसाधारण' याचा अर्थ सरपंच पदासाठी कोणत्याही प्रवर्गातील स्त्री अथवा पुरुष कोणीही पात्र राहील.
यावेळी मंडळ अधिकारी श्री. अशोक सोनवणे, तलाठी बालाजी लोंढे, ग्राामसेेवक श्रीमती पाटील तसेच गावातील नागरिक बहुसंख्येने उपस्थित होते.
तीन महिन्यापेक्षा अधिककाळ धान्य न घेतलेल्या कुटूंबाच्या शिधापत्रिका रद्द होणार
तलाठी सजा पाळधी बु.December 04, 2019जिल्हा माहिती कार्यालय, वृत्तपत्र संकलन, शिधापत्रिका
No comments

जिल्हास्तरीय दक्षता समितीची बैठक संपन्न
तीन महिन्यापेक्षा अधिककाळ धान्य न घेतलेल्या
कुटूंबाच्या शिधापत्रिका रद्द करा.
- डॉ. नंदकुमार बेडसे
जळगाव, दि. 3 - तीन महन्यापेक्षा अधिक काळापासून ज्या शिधापत्रिकेवर धान्य घेतले नसेल. अशा शिधापत्रिका धारकांची चौकशी 31 डिसेंबरपूर्वी करुन या शिधापत्रिका रद्द करण्याची कार्यवाही पुरवठा विभागाने तातडीने सुरु करावी. अशा सुचना प्रभारी जिल्हाधिकारी डॉ. नंदकुमार बेडसे यांनी आज दिल्यात.
जिल्हास्तरीय दक्षता समितीची मासिक बैठक आज प्रभारी जिल्हाधिकारी डॉ. बेडसे यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हाधिकारी कार्यालयातील सभागृहात पार पडली. या बैठकीस जिल्हा पुरवठा अधिकारी सुनिल सुर्यवंशी, जिल्हा माहिती अधिकारी विलास बोडके, सहायक जिल्हा पुरवठा अधिकारी प्रशांत कुलकर्णी, जी. पी. इरवतकर यांचेसह अशासकीय सदस्य सुनिल जावळे, महेंद्र बोरसे, रामकृष्ण पाटील, डॉ. श्रीमती. अर्चना पाटील उपस्थित होते.
यावेळी डॉ. बेडसे म्हणाले की, जिल्ह्यात अंत्योदय योजनेतंर्गत अनेक लाभार्थी त्यांचे धान्य घेत नसल्याचे निदर्शनास आले आहे. असे लाभार्थी त्या गावात राहतात किंवा कसे याबाबतची चौकशी 31 डिसेंबरपूर्वी पूर्ण करण्यात यावी. जे लाभार्थी राहत नाही, बोगस आहेत अथवा त्यांची दुबार नावे आहेत. या कारणामुळे धान्य घेत नसतील तर त्यांची नावे लाभार्थ्यांच्या यादीतून वगळण्यात यावी. जेणेकरुन नवीन लाभार्थ्यांचे नाव या योजनेत समाविष्ठ करणे शक्य होईल. नवीन लाभार्थी निवडताना ग्रामसभेचे ठराव घेऊन नाव समाविष्ठ करावे. तसेच यामध्ये गरीब व गरजू लाभार्थ्यांचाच समावेश करावा अशा सुचनाही डॉ. बेडसे यांनी दिल्या. तसेच स्वत धान्य दुकानदारांना वेळेत धान्य पोच होत नसल्याची तक्रार अशासकीय सदस्यांनी बैठकीत केली असता धान्य वाहतुक ठेकेदारांनी विहित वेळेत धान्य दुकानदारांकडे पोच होईल याची दक्षता घेण्याच्या सुचनाही ठेकेदारास देण्याबाबतचे निर्देश डॉ बेडसे यांनी दिले.
जिल्ह्यात 6 लाख 597 कुटूबांना धान्य वितरीत करण्यात केले जाते. परंतु यापैकी 87 टक्के लाभार्थीच धान्य घेतात. उर्वरित 13 टक्के लाभार्थी धान्य घेण्यास येतच नाही. त्यामुळे धान्य दुकानदारांकडे धान्य शिल्लक राहते. लाभार्थ्यांनी आपल्या कुटूंबातील सर्व सदस्यांचे आधारकार्ड नंबर देणे आवश्यक आहे. परंतु अनेक रेशनकार्डधारकांनी अद्यापही आपल्या कुटूंबातील सदस्यांचे आधारकार्ड नंबर दिलेले नाही. त्यामुळे ऑनलाईन धान्य वितरणात अडचणी येत आहे. पूर्वी जिल्ह्यात 16 हजार मे. टन धान्य वितरीत केले जात होते. परंतु आता फक्त 9 हजार मे. टन धान्य वितरीत करावे लागत आहे. जिल्ह्यात ऑनलाईन धान्य वितरण प्रणालीमुळे मोठ्या प्रमाणात धान्याची बचत होत आहे. असल्याची माहिती जिल्हा पुरवठा अधिकारी सुनील सुर्यंवशी यांनी बैठकीत दिली.
त्याचबरोबर धान्य वितरणासंबंधी तक्रारींची जिल्हा प्रशासनाने दखल घेतली असून यापुढे नागरीकांना वितरणासबंधीच्या तक्रारी 9307592572 या व्हॅटसॲप क्रमांकावर पाठविता येणार आहे. वितरणासंबंधीच्या तक्रारींसाठी नागरीकांना तहसील व जिल्हाधिकारी कार्यालयात उपस्थित राहून अर्जाद्वारे आपल्या अडीअडचणी मांडाव्या लागतात. यामध्ये नागरीकांचा वेळ वाया जातो. तसेच याकीरता त्यांना गावाहून तालुक्याच्या ठिकाणी यावे लागते. ही बाब लक्षात घेऊन प्रशासनाने अशा तक्रारी व अडीअडचणी सोडविण्यासाठी यापुढे व्हॅटसॲपची सुविधा उपलब्ध करुन दिली आहे. नागरीकांनी या क्रमाकांवर तक्रारी मांडल्यास या तक्रारींचे तात्काळ निवारण पुरवठा विभागामार्फत करण्यात येणार आहे.
000
PMKISAN संबंधित दुरुस्ती करण्याच्या सुविधा आता सर्व सेतू केंद्रांवर
PMKISAN संबंधित दुरुस्ती करण्याच्या सुविधा आता सर्व सेतू केंद्रांवर देण्यात आलेल्या आहेत.
प्रधानमंत्री पिक विमा योजनेत सहभागासाठी 31 डिसेंबर पर्यंत मुदत
प्रधानमंत्री पिक विमा योजनेत सहभागासाठी 31 डिसेंबर पर्यंत मुदत
• 360 रुपयात मिळणार 24 हजार रुपयांचे पीक विमा संरक्षण
• जोखीम टाळण्यासाठी जिल्ह्यातील अधिकाधिक शेतकऱ्यांनी सहभागी होण्याचे आवाहन
जळगाव, दि. 30 - रब्बी हंगाम 2019-20 मध्ये अधिसुचित पीकासाठी प्रधानमंत्री पिक विमा योजना राबविण्यात येत आहे. या योजनेत शेतकऱ्यांना सहभागी होण्यासाठी 31 डिसेंबर, 2019 पर्यंत अंतिम मुदत आहे. रब्बी हंगाम घेणाऱ्या शेतकऱ्यांना नैसर्गिक आपत्ती, किड आणि रोगासारख्या अकल्पित प्रतिकूल परिस्थितीमुळे पिकांचे नुकसान झाल्यास शेतकऱ्यांना विमा संरक्षण देणे आणि पिकांच्या नुकसानीच्या अत्यंत कठीण परिस्थितीतही शेतकऱ्यांचे आर्थिक स्थैर्य अबाधित राखणे. हा शेतकरी हिताचा उद्देश डोळ्यासमोर ठेवून रब्बी हंगाम 2019-2020 मध्ये जिल्ह्यात प्रधानमंत्री पिक विमा योजना अधिसूचित क्षेत्रातील अधिसूचित पिकांसाठी विमा क्षेत्र घटक धरून (Area Approach) राबविण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे.
प्रधानमंत्री पिक विमा योजनेची वैशिष्ट्ये- ही योजना कर्जदार शेतकऱ्यांना बंधनकारक असून बिगर कर्जदार शेतकऱ्यांना एैच्छिक आहे. नुकसान भरपाई कृषि आयुक्तालयामार्फत पिक उत्पादनाच्या अंदाजासाठी घेतलेल्या पिक कापणी प्रयोगाच्या उत्पादकतेच्या सरासरी आकडेवारीवर आधारित असेल. जोखीमस्तर सर्व पिकांसाठी 70 टक्के असा निश्चित करण्यात आला आहे.
जोखमीच्या बाबी-अपूरा पाऊस, हवामानातील इतर घटकांच्या प्रतिकुल परिस्थितीमुळे केवळ अधिसुचित मुख्य पिकांची अधिसुचित क्षेत्रात व्यापक प्रमाणावर पेरणी/लावणी होवू न शकलेल्या क्षेत्रासाठी पेरणी/लावणी न झालेले क्षेत्र हे सर्वसाधारण क्षेत्राच्या 75 टक्के पेक्षा जास्त असल्यास विमा संरक्षण देय राहिल. दुष्काळ, पावसातील खंड, पुर, क्षेत्र जलमय होणे, कीड व रोगांचा व्यापक प्रादुर्भाव, भूस्खलन, नैसर्गिक आग, वीज कासळणे, चक्रीवादळ आणि गारपीट या टाळता न येण्यायोग्य जोखमींमुळे पिके पेरणीपासून काढणीपर्यंतच्या कालावधीत पिकांच्या उत्पन्नात येणाऱ्या घटीपासून व्यापक विमा संरक्षण देय राहिल.
पिकनिहाय विमा हप्ता दर व विमा सरक्षित रक्कम- सर्व अन्नधान्य व गळीत धान्य पिकांसाठी संरक्षित रकमेच्या 1.5 टक्के दराने आणि कांदा पिकासाठी संरक्षित रकमेच्या 5 टक्के दराने विमा हप्ता आकारला जाईल. पिके, जोखीमस्तर (टक्केवारीत), विमा संरक्षित रक्कम (रुपयात), शेतकऱ्याने भरावयाची विमा हप्ता रक्कम अनुक्रमे अशाप्रकारे आहेत. प्रत्येक पिकाचा जोखीमस्तर 70 टक्के इतका राहिल. गहू, बाजरी- विमा संरक्षित रक्कम रुपये 33 हजार, शेतकऱ्यांने भरावयाची विमा हप्ता रक्कम रुपये 450/-, ज्वारी,बाजरी- विमा संरक्षित रक्कम 24 हजार रुपये, शेतकऱ्याने भरावयाची विमा हप्ता रक्कम रुपये 360/-, ज्वारी जिरायत- विमा संरक्षित रक्कम रुपये 24 हजार, शेतकऱ्याने भरावयाची विमा हप्ता रक्कम रुपये 360/-, हरभरा- विमा संरक्षित रक्कम रुपये 24 हजार, शेतकऱ्याने भरावयाची विमा हप्ता रक्कम रक्कम रुपये 360/-, भुईमुग- विमा संरक्षित रक्कम रुपये 35 हजार, शेतकऱ्याने भरावयाची विमा हप्ता रक्कम रुपये 525/-, कांदा- विमा संरक्षित रक्कम रुपये 52 हजार, शेतकऱ्याने भरावयाची रक्कम रुपये 2600/- अशाप्रकारे आकारणी करण्यात येईल.
रब्बी हंगाम 2019-2020 अंतर्गत प्रधानमंत्री पीक विमा योजनेंमध्ये अधिसुचित क्षेत्रातील अधिसुचित पिकांसाठी बिगर कर्जदार शेतकऱ्यांनी सहभागी होण्यासाठी जवळच्या बँकेत, आपले सरकार सेवा केंद्र, जिल्हा मध्यवर्ती बँकेशी संपर्क साधून सहभाग नोदवावा. अथवा www.pmfby.gov.in या संकेतस्थळावर स्वत: सहभाग नोदविण्याची सुविधा आहे. कर्जदार शेतकऱ्यांचा हप्ता संबंधित बँकेद्वारे भरला जाऊन सहभाग नोदविला जातो. विमा हप्ता भरण्यापूर्वी आपले शिवार ज्या महसूल मंडळात आहे, त्या महसूल मंडळाचा योजनेंतर्गत समावेश असल्याबाबतची खात्री केल्यावरच विमा हप्ता भरावा. अधिक माहितीसाठी नजिकच्या जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक शाखा, राष्ट्रीयकृत बँक शाखा, आपले सरकार सेवा केंद्र, तालुका कृषि अधिकारी कार्यालय, उपविभागीय कृषि अधिकारी कार्यालय, जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी, जळगाव यांचे कार्यालयाशी संपर्क साधावा. असे आवाहन संभाजी ठाकूर, जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी, जळगाव यांनी एका प्रसिद्धी पत्रकान्वये केले आहे.
000
• 360 रुपयात मिळणार 24 हजार रुपयांचे पीक विमा संरक्षण
• जोखीम टाळण्यासाठी जिल्ह्यातील अधिकाधिक शेतकऱ्यांनी सहभागी होण्याचे आवाहन
जळगाव, दि. 30 - रब्बी हंगाम 2019-20 मध्ये अधिसुचित पीकासाठी प्रधानमंत्री पिक विमा योजना राबविण्यात येत आहे. या योजनेत शेतकऱ्यांना सहभागी होण्यासाठी 31 डिसेंबर, 2019 पर्यंत अंतिम मुदत आहे. रब्बी हंगाम घेणाऱ्या शेतकऱ्यांना नैसर्गिक आपत्ती, किड आणि रोगासारख्या अकल्पित प्रतिकूल परिस्थितीमुळे पिकांचे नुकसान झाल्यास शेतकऱ्यांना विमा संरक्षण देणे आणि पिकांच्या नुकसानीच्या अत्यंत कठीण परिस्थितीतही शेतकऱ्यांचे आर्थिक स्थैर्य अबाधित राखणे. हा शेतकरी हिताचा उद्देश डोळ्यासमोर ठेवून रब्बी हंगाम 2019-2020 मध्ये जिल्ह्यात प्रधानमंत्री पिक विमा योजना अधिसूचित क्षेत्रातील अधिसूचित पिकांसाठी विमा क्षेत्र घटक धरून (Area Approach) राबविण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे.
प्रधानमंत्री पिक विमा योजनेची वैशिष्ट्ये- ही योजना कर्जदार शेतकऱ्यांना बंधनकारक असून बिगर कर्जदार शेतकऱ्यांना एैच्छिक आहे. नुकसान भरपाई कृषि आयुक्तालयामार्फत पिक उत्पादनाच्या अंदाजासाठी घेतलेल्या पिक कापणी प्रयोगाच्या उत्पादकतेच्या सरासरी आकडेवारीवर आधारित असेल. जोखीमस्तर सर्व पिकांसाठी 70 टक्के असा निश्चित करण्यात आला आहे.
जोखमीच्या बाबी-अपूरा पाऊस, हवामानातील इतर घटकांच्या प्रतिकुल परिस्थितीमुळे केवळ अधिसुचित मुख्य पिकांची अधिसुचित क्षेत्रात व्यापक प्रमाणावर पेरणी/लावणी होवू न शकलेल्या क्षेत्रासाठी पेरणी/लावणी न झालेले क्षेत्र हे सर्वसाधारण क्षेत्राच्या 75 टक्के पेक्षा जास्त असल्यास विमा संरक्षण देय राहिल. दुष्काळ, पावसातील खंड, पुर, क्षेत्र जलमय होणे, कीड व रोगांचा व्यापक प्रादुर्भाव, भूस्खलन, नैसर्गिक आग, वीज कासळणे, चक्रीवादळ आणि गारपीट या टाळता न येण्यायोग्य जोखमींमुळे पिके पेरणीपासून काढणीपर्यंतच्या कालावधीत पिकांच्या उत्पन्नात येणाऱ्या घटीपासून व्यापक विमा संरक्षण देय राहिल.
पिकनिहाय विमा हप्ता दर व विमा सरक्षित रक्कम- सर्व अन्नधान्य व गळीत धान्य पिकांसाठी संरक्षित रकमेच्या 1.5 टक्के दराने आणि कांदा पिकासाठी संरक्षित रकमेच्या 5 टक्के दराने विमा हप्ता आकारला जाईल. पिके, जोखीमस्तर (टक्केवारीत), विमा संरक्षित रक्कम (रुपयात), शेतकऱ्याने भरावयाची विमा हप्ता रक्कम अनुक्रमे अशाप्रकारे आहेत. प्रत्येक पिकाचा जोखीमस्तर 70 टक्के इतका राहिल. गहू, बाजरी- विमा संरक्षित रक्कम रुपये 33 हजार, शेतकऱ्यांने भरावयाची विमा हप्ता रक्कम रुपये 450/-, ज्वारी,बाजरी- विमा संरक्षित रक्कम 24 हजार रुपये, शेतकऱ्याने भरावयाची विमा हप्ता रक्कम रुपये 360/-, ज्वारी जिरायत- विमा संरक्षित रक्कम रुपये 24 हजार, शेतकऱ्याने भरावयाची विमा हप्ता रक्कम रुपये 360/-, हरभरा- विमा संरक्षित रक्कम रुपये 24 हजार, शेतकऱ्याने भरावयाची विमा हप्ता रक्कम रक्कम रुपये 360/-, भुईमुग- विमा संरक्षित रक्कम रुपये 35 हजार, शेतकऱ्याने भरावयाची विमा हप्ता रक्कम रुपये 525/-, कांदा- विमा संरक्षित रक्कम रुपये 52 हजार, शेतकऱ्याने भरावयाची रक्कम रुपये 2600/- अशाप्रकारे आकारणी करण्यात येईल.
रब्बी हंगाम 2019-2020 अंतर्गत प्रधानमंत्री पीक विमा योजनेंमध्ये अधिसुचित क्षेत्रातील अधिसुचित पिकांसाठी बिगर कर्जदार शेतकऱ्यांनी सहभागी होण्यासाठी जवळच्या बँकेत, आपले सरकार सेवा केंद्र, जिल्हा मध्यवर्ती बँकेशी संपर्क साधून सहभाग नोदवावा. अथवा www.pmfby.gov.in या संकेतस्थळावर स्वत: सहभाग नोदविण्याची सुविधा आहे. कर्जदार शेतकऱ्यांचा हप्ता संबंधित बँकेद्वारे भरला जाऊन सहभाग नोदविला जातो. विमा हप्ता भरण्यापूर्वी आपले शिवार ज्या महसूल मंडळात आहे, त्या महसूल मंडळाचा योजनेंतर्गत समावेश असल्याबाबतची खात्री केल्यावरच विमा हप्ता भरावा. अधिक माहितीसाठी नजिकच्या जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक शाखा, राष्ट्रीयकृत बँक शाखा, आपले सरकार सेवा केंद्र, तालुका कृषि अधिकारी कार्यालय, उपविभागीय कृषि अधिकारी कार्यालय, जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी, जळगाव यांचे कार्यालयाशी संपर्क साधावा. असे आवाहन संभाजी ठाकूर, जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी, जळगाव यांनी एका प्रसिद्धी पत्रकान्वये केले आहे.
000
चोपडा-धरणगाव-जळगाव वाहतूक मार्गात आजपासून बदल
चोपडा-धरणगाव-जळगाव वाहतूक मार्गात आजपासून बदल
पर्यायी मार्गाने वाहतुक करण्याचे जिल्हा पोलीस अधीक्षकांचे आवाहन
जळगाव, दि. 30 - मेहेरगाव-धुळे-अमळनेर-चोपडा-खरगोन रस्ता राज्यमार्ग-15 कि.मी 86/500 मधील निमगव्हाण जवळील तापी नदी पुलाचे दुरूस्तीचे काम राज्य शासनामार्फत करण्यात येत आहे. या कामाचा ठेका मे. सॅनफिल्ड इंडिया लिमीटेड, भोपाळ या कंपनीला देण्यात आलेला आहे. पुलाच्या जुन्या बिअरींग बसविणे, नवीन एक्सापान्शन जॉइंट बसविणे आदि बाबींचा समावेश आहे. या कामाची व्याप्ती पाहता प्रत्यक्षात काम करताना पुलाचे गर्डर उचलून नवीन बिअरिंग बसविणे प्रस्तावित असल्याने पुलावरील वाहतुक कमीत कमी एक महिना बंद करणे आवश्यक आहे. तसेच पुलाच्या शेजारुन पर्यायी मार्ग बनविणे अशक्य आहे. त्यामुळे या रस्त्यावरील वाहतुक पर्यायी मार्गावरून कळविणे आवश्यक आहे.
वाहनांच्या विनियमनासाठी आणि कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी चोपडा ते जळगाव (धरणगाव मार्गे), चोपडा ते अमळनेर, चोपडा ते धरणगाव या तीन्ही मार्गावरून येणारी व जाणारी सर्व प्रकारच्या वाहतुकीस रविवार, 1 डिसेंबर ते 30 डिसेंबर, 2019 पावेतो सर्व प्रकारची वाहतुक बंद करून पर्यायी मार्गाने वाहतुक वळविण्यात येत आहे.
चोपडा ते जळगाव (धरणगाव मार्गे) होणाऱ्या वाहतुकीकरीता नागरीकांनी पर्यायी मार्ग चोपड, अडावद, धानोरा मार्ग जळगाव या मार्गाचा येण्यासाठी व जाण्यासाठी वापर करावा. चोपडा ते अमळनेर दरम्यान होणाऱ्या वाहतुकीकरीता नागरीकांनी चोपडा, हातेड बु. मार्गे तसेच अमळगाव, जळोद मार्गे या पर्यायी मार्गाचा येण्यासठी व जाण्यासाठी वापर करावा, चोपडा ते धरणगाव दरम्यानच्या होणाऱ्या वाहतुकीसाठी नागरीकांनी चोपडा, जळोद, अमळगाव, नांद्री, पातोंडा तसेच चोपडा, हातेड, जळोद, नांद्री, पातोंडा मार्गे या पर्यायी मार्गाचा येण्यासाठी व जाण्यासाठी वापर करावा. या मार्गावरुन प्रवास करणाऱ्या सर्व नागरिकांनी याची नोंद घ्यावी व प्रशासनास सहकार्य करावे. असे आवाहन जिल्हा पोलीस अधिक्षक डॉ. पंजाबराव उगले यांनी एका प्रसिध्दी पत्रकान्वये केले आहे.
000
पर्यायी मार्गाने वाहतुक करण्याचे जिल्हा पोलीस अधीक्षकांचे आवाहन
जळगाव, दि. 30 - मेहेरगाव-धुळे-अमळनेर-चोपडा-खरगोन रस्ता राज्यमार्ग-15 कि.मी 86/500 मधील निमगव्हाण जवळील तापी नदी पुलाचे दुरूस्तीचे काम राज्य शासनामार्फत करण्यात येत आहे. या कामाचा ठेका मे. सॅनफिल्ड इंडिया लिमीटेड, भोपाळ या कंपनीला देण्यात आलेला आहे. पुलाच्या जुन्या बिअरींग बसविणे, नवीन एक्सापान्शन जॉइंट बसविणे आदि बाबींचा समावेश आहे. या कामाची व्याप्ती पाहता प्रत्यक्षात काम करताना पुलाचे गर्डर उचलून नवीन बिअरिंग बसविणे प्रस्तावित असल्याने पुलावरील वाहतुक कमीत कमी एक महिना बंद करणे आवश्यक आहे. तसेच पुलाच्या शेजारुन पर्यायी मार्ग बनविणे अशक्य आहे. त्यामुळे या रस्त्यावरील वाहतुक पर्यायी मार्गावरून कळविणे आवश्यक आहे.
वाहनांच्या विनियमनासाठी आणि कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी चोपडा ते जळगाव (धरणगाव मार्गे), चोपडा ते अमळनेर, चोपडा ते धरणगाव या तीन्ही मार्गावरून येणारी व जाणारी सर्व प्रकारच्या वाहतुकीस रविवार, 1 डिसेंबर ते 30 डिसेंबर, 2019 पावेतो सर्व प्रकारची वाहतुक बंद करून पर्यायी मार्गाने वाहतुक वळविण्यात येत आहे.
चोपडा ते जळगाव (धरणगाव मार्गे) होणाऱ्या वाहतुकीकरीता नागरीकांनी पर्यायी मार्ग चोपड, अडावद, धानोरा मार्ग जळगाव या मार्गाचा येण्यासाठी व जाण्यासाठी वापर करावा. चोपडा ते अमळनेर दरम्यान होणाऱ्या वाहतुकीकरीता नागरीकांनी चोपडा, हातेड बु. मार्गे तसेच अमळगाव, जळोद मार्गे या पर्यायी मार्गाचा येण्यासठी व जाण्यासाठी वापर करावा, चोपडा ते धरणगाव दरम्यानच्या होणाऱ्या वाहतुकीसाठी नागरीकांनी चोपडा, जळोद, अमळगाव, नांद्री, पातोंडा तसेच चोपडा, हातेड, जळोद, नांद्री, पातोंडा मार्गे या पर्यायी मार्गाचा येण्यासाठी व जाण्यासाठी वापर करावा. या मार्गावरुन प्रवास करणाऱ्या सर्व नागरिकांनी याची नोंद घ्यावी व प्रशासनास सहकार्य करावे. असे आवाहन जिल्हा पोलीस अधिक्षक डॉ. पंजाबराव उगले यांनी एका प्रसिध्दी पत्रकान्वये केले आहे.
000
प्रधानमंत्री कृषी सन्मान योजनेच्या लाभासाठी आधारकार्ड जोडण्याकरीता 30 नोव्हेंबरपर्यंत मुदत
जळगाव, दि. 23 :- जळगाव जिल्ह्यात प्रधानमंत्री कृषी सन्मान योजना फेब्रुवारी, 2019 पासुन राबविण्यात येत आहे. शासनाकडून आलेल्या मार्गदर्शक सुचनांप्रमाणे प्रधानमंत्री कृषी सन्मान योजनेसाठी (PM-KISAN) सर्व शेतकरी कुटूंबाची माहिती PM-KISAN पोर्टलवर अपलोड करण्यात आली आहे. त्यापैकी पात्र शेतकरी लाभार्थ्यांना सदर योजनेचा तीन टप्पयात लाभ प्राप्त झालेला आहे.
शासनाकडून आलेल्या मार्गदर्शक सुचनांप्रमाणे चौथ्या टप्प्यापासून लाभ देतांना पात्र लाभार्थी शेतकऱ्यांचे PM-KISAN पोर्टवरील नांव व आधार कार्डवरील नाव सारखे असणे अनिवार्य आहे. जळगाव जिल्ह्यातील एकुण नोंदणी झालेल्या 3 लाख 91 हजार 466 लाभार्थ्यांपैकी 1 लाख 31 हजार 834 इतक्या लाभार्थ्यांचे नांव आधार कार्डप्रमाणे PM-KISAN पोर्टलवर नाही. यासाठी पात्र लाभार्थी शेतकरी यांनी शासनाच्या www.pmkisan.gov.in या संकेतस्थळावरील Farmers Corner या लिंकमध्ये जाऊन Edit Aadhar Failure Record मध्ये आपला आधार क्रमांक टाकावा. जर लाभार्थ्यांचे नाव आधारकार्ड प्रमाणे बरोबर असेल तर Record not found for correction or It has corrected असा संदेश येईल. म्हणजेच त्या लाभार्थ्यांचे नांव आधार कार्ड प्रमाणे बरोबर आहे.
जर आधार कार्डवरील नाव आणि PM-KISAN पोर्टवरील नावात तफावत असेल तर सदर नांव Edit (दुरुस्ती) करणेसाठी उपलब्ध होईल. नंतर लाभार्थी यांना आपल्या आधार कार्डवरील नावाप्रमाणेच (Spelling/Space/Small/Capital Letter इ. जसे आहे तसेच) Farmer Name Update करणे आवश्यक आहे. सदर दुरुस्ती स्वत: लाभार्थी यांना किंवा माहितीगार व्यक्तीकडून करता येईल. लाभार्थी यांना मोबाईलचा वापर करुन सुद्धा आपले नांव Update करता येईल.
याशिवाय सदर कामासाठी आपल्या गावाचे तलाठी यांचेकडे ज्या नांवाची दुरुस्ती करावयाची आहे. अशा यादी पुरविण्यात आली असून लाभार्थी हे त्यांचे नावाची दुरुस्ती तलाठी यांचेमार्फत सुद्धा करुन घेऊ शकतात. PM-KISAN पोर्टलवरील नांव आधार कार्ड प्रमाणे अद्ययावत करणेबाबतची कार्यवाही 30 नोव्हेंबर, 2019 पर्यंतच करावयाची आहे. तसेच सदर नाव Update करणेबाबतची सुविधा PM-KISAN पोर्टलवर निशुल्क उपलब्ध आहे. असे जिल्हाधिकारी डॉ. अविनाश ढाकणे यांना प्रसिद्धी पत्रकान्वये कळविले आहे.
000
स्थळ निरीक्षण : वसुली आढावा
आज पाळधी बु.व पोखरी परिसरातील स्टोन क्रेशर, खाणपट्टा संदर्भातील रॉयल्टी भरणा बाबत मा. तहसिलदार धरणगाव श्री. नितीन देवरे साहेब ,तलाठी बालाजी लोंढे तसेच कोतवाल राहुल शिरोळे यांनी प्रत्यक्ष खाणपट्ट्यावर जाऊन पहाणी केली. यावेळी संबंधित मालकांना त्यांच्याकडील थकीत रकमेचा लवकरात लवकर भरणा करण्याचे आवाहन करण्यात आले. यावेळी अनधिकृत बिनशेती वापराबाबत प्रकरणे शोधण्यात आली. याबाबत संबंधित मालकांवर योग्य ती कायदेशीर कार्यवाही करण्यात येईल.
पोखरी येथे प्रभागनिहाय आरक्षण सोडत : ग्रामसभा संपन्न

मौजे पोखरी येथे प्रभागनिहाय आरक्षण सोडत काढण्यासाठी आज दि.18/11/2019 रोजी सकाळी 10.30 वाजता बैठकीचे आयोजन करण्यात आले होते.
अंगणवाडीच्या इमारतीमध्ये सदरची सभा आयोजित करण्यात आली होती. या सभेस प्राधिकृत अधिकारी श्री.बिऱ्हाडे मं.अ.साळवा भाग, श्री.प्रकाश बाविस्कर मं.अ.सोनवद भाग, श्री.बालाजी लोंढे तलाठी पोखरी, सरपंच मंगल पाटील, श्री.श्याम पाटील प्रभारी ग्रामसेवक पोखरी, कोतवाल, पोलीस पाटील, ग्रामपंचायत शिपाई तसेच पोखरी व तांडा मधील नागरिक बहुसंख्येने उपस्थित होते.
यावेळी प्रथम प्राधिकृत अधिकारी श्री.बिऱ्हाडे यांनी सभा बोलविण्याबाबत प्रास्ताविक केले. त्यानंतर तलाठी बालाजी लोंढे यांनी प्रभाग निहाय विस्तार कसा आहे याबाबत स्पष्टीकरण केले. तदनंतर प्रभागनिहाय आरक्षण सोडत काढण्यात आली. यावेळी गावातील लहान बालक व बालीकेच्या हस्ते चिठ्ठया टाकून आरक्षण सोडत काढण्यात आली. प्रभागनिहाय आरक्षणाबाबत श्री.बिऱ्हाडे व श्री.बाविस्कर यांनी नागरिकांना मार्गदर्शन केले. यावेळी प्राधिकृत अधिकारी श्री.बिऱ्हाडे व श्री.बाविस्कर यांनी नागरिकांना आरक्षण सोडत समावून सांगीतली
व त्यांच्या प्रश्नांचे अभ्यासपूर्वक उत्तर देवून समाधान केले.
सदर सभेच्या यशस्वीतेसाठी स्थानिक पोलीस पाटील, ग्रामपंचायत शिपाई, कोतवाल व नागरिकांनी मोलाचे सहकार्य लाभले. त्यानंतर मौजे एकलग्न बु.येथे प्रभागनिहाय आरक्षण सोडत काढण्यासाठी सभा घेण्यात आली.
59 व्या राज्य हौशी नाट्य स्पर्धेला सुरुवात
तलाठी सजा पाळधी बु.November 17, 201959 व्या राज्य हौशी नाट्य स्पर्धा, जिल्हा माहिती कार्यालय
No comments

हौशी रंगकर्मींसाठी महाराष्ट्र शासनाची 58 वर्षांची परंपरा असलेली स्पर्धा
जळगाव, दि. 11 - राज्यातील 19 केंद्रावर हौशी रंगकर्मींसाठी आयोजित होणारी राज्य नाट्य स्पर्धा आजही आपले वलय टिकवून आहे. महाराष्ट्र शासनाच्या सांस्कृतिक कार्य संचालनातर्फे आयोजित होणार्या 59 व्या राज्य नाट्य स्पर्धेची जळगाव केंद्रावरील प्राथमिक फेरी छत्रपती संभाजीराजे नाट्यगृहात दि. 15 नोव्हेंबर ते 5 डिसेंबर, 2019 दरम्यान आयोजित करण्यात आली आहे. सांस्कृतिक कार्य संचालनालय मराठी रंगभूमी समृध्द करण्याकरिता या स्पर्धांचे आयोजन करीत असते. स्पर्धेची गौरवसंपन्न अशी 58 वर्षे पूर्ण झाली आहेत. आजवरच्या स्पर्धांतून नवनवीन प्रयोग करून मराठी रंगभूमीस समृध्द करुन वैश्विक स्तरावर नेणारे अनेक नाटककार, अभिनेते, तंत्रज्ञ व दिग्दर्शक मराठी रंगभूमीला लाभले आहे. मराठी रंगभूमी अजून सृजनशील, क्रियाशील व तेजस्वी करण्यासाठी राज्यभरातील 19 केंद्रावर या स्पर्धेची प्राथमिक फेरी आयोजित करण्यात येते. यंदा जळगाव केंद्रावरील प्राथमिक फेरी दि. 15 नोव्हेंबर ते 5 डिसेंबर दरम्यान शहरातील छत्रपती संभाजीराजे नाट्यगृहात सायं. 7 वाजता होणार आहेत. जळगाव केंद्रावर 21 दिवस ही स्पर्धा सुरु राहणार असून, 15 नोव्हेंबर रोजी उत्कर्ष कलाविष्कार भुसावळतर्फे राहुल बनसोडे लिखीत, अनिल कोष्टी दिग्दर्शित आर्टिफिशिअल इंजेलिजन्स, 16 नोव्हेंबरला सुबोध बहु. युवा प्रतिष्ठान जळगावतर्फे रुपाली गुंगे लिखीत राज गुंगे दिग्दर्शित जतरा, दि. 17 नोव्हेंबर रोजी लोकमंगल कलाविष्कार सह.संस्था धुळेतर्फे निळकंठ महाजन लिखीत, सुजय भालेराव दिग्दर्शित उजेड विकणारी बाई, 18 नोव्हेंबरला मध्यप्रदेश मराठी अकादमी इंदौर यांचे अमोल रेडीज लिखीत, पंकज वागळे दिग्दर्शित जिहाद, 19 नोव्हेंबर रोजी नाट्यभारती इंदौर यांचे ऋषिकेश वैद्य लिखीत, अमोल दामले अनुवादीत श्रीराम जोग दिग्दर्शित मॉर्फोसिस, दि. 20 नोव्हेंबर भारतीय साहित्य सांस्कृतिक कला विकास मंच भुसावळ यांचे वैभव भंडारी लिखीत, संजय तारांबळे दिग्दर्शित पंचम, दि. 21 नोव्हेंबरला नूतन मराठा महाविद्यालयाचे हनुमान सुरवसे लिखीत दिग्दर्शित बुजगावन, दि.22 नोव्हेंबरला समर्थ बहु. संस्था जवखेडे यांचे विठ्ठल सावंत लिखीत, विशाल जाधव दिग्दर्शित अर्जुन की अभिमन्यू, दि. 23 नोव्हेंबर रोजी जय गणेश फाऊंडेशन भुसावळ तर्फे विरेंद्र पाटील लिखीत दिग्दर्शित झेंडूचं फुल, दि. 24 नोव्हेंबर जननायक थिएटर ग्रुप जळगावतर्फे सोनल चौधरी लिखीत दिग्दर्शित 2048, दि. 25 नोव्हेंबर रोजी केअर टेकर फाऊंडेशन जळगाव यांचे रमेश भोळे लिखीत दिग्दर्शित विश्वासघात, दि. 26 नोव्हेंबरला फ्लाईंग बर्ड फाऊंडेशन जळगाव यांचे आनंद प्रभू लिखीत, किरणकुमार अडकमोल दिग्दर्शित लग्न नको पण पप्पा आवर, दि. 27 नोव्हेंबर रोजी डॉ.अ.जी.जी.बेंडाळे महाविद्यालय, जळगाव यांचे रुपाली गुंगे लिखीत, अश्विनी भालकर दिग्दर्शित शकुंतला एक विरह, दि. 28 नोव्हेंबर रोजी कलवोब मल्टीपर्पज फाऊंडेशन यांचे सुरेश राघव लिखीत, आकाश बाविस्कर लिखीत मानसन्मान, 29 नोव्हेंबर रोजी इंदाई फाऊंडेशन, बदरखे, ता.पाचोरा यांचे शफाअत खान लिखीत, रमेश लिला दिग्दर्शित पोलीसनामा, दि. 30 नोव्हेंबर रोजी भुसावळ औष्णिक विद्युत केंद्र यांचे चंद्रकांत सपकाळे लिखीत, राजेश पवार दिग्दर्शित नव्या सूर्याची पहाट, दि. 1 डिसेंबर रोजी मूळजी जेठा महाविद्यालय, जळगाव यांचे श्रीपाद देशपांडे, हेमंत पाटील दिग्दर्शित इस्टमन कलर, दि. 2 डिसेंबर रोजी अविरत इंदौर यांचे अभिनय देशमुख लिखीत दिग्दर्शित मोस्ट वॉन्टेड मिलिंद, दि. 3 डिसेंबर रोजी अष्टरंग इंदौर यांचे प्रशांत दळवी लिखीत, अनिल चापेकर दिग्दर्शित ध्यानीमनी, दि. 4 डिसेंबर रोजी अखिल भारतीय लेवा विकास महासंघ, जळगाव यांचे वैभव मावळे लिखीत दिग्दर्शित कोण नथुराम? मी गोखले विचारतोय तर स्पर्धेच्या शेवटच्या दिवशी दि. 5 डिसेंबर रोजी आप्पासाहेब विश्वासराव भालेराव प्रतिष्ठान जळगाव शरद भालेराव लिखीत, चिंतामण पाटील दिग्दर्शित हल्लाबोल ही नाटके सादर होणार आहेत. शासकीय स्पर्धा असल्याने, तिकीट दर 15 व 10 रुपये असून, जास्तीत जास्त नाट्यरसिकांनी या नाट्यपर्वणीचा लाभ घ्यावा, असे आवाहन सांस्कृतिक कार्य संचालनालय महाराष्ट्र राज्याचे सचिव बिभीषण चवरे व जळगाव येथील राज्य नाट्य समन्वयिका सरिता खाचणे यांनी केले आहे.000
मोठी बातमी: राज्यपालांकडून शेतकऱ्यांना हेक्टरी ८००० रुपयांची मदत जाहीर
मोठी बातमी: राज्यपालांकडून शेतकऱ्यांना हेक्टरी ८००० रुपयांची मदत जाहीर
दोन हेक्टरपर्यंत जमीन असलेल्या शेतकऱ्यांना खरीप पिकांसाठी ही नुकसान भरपाई मिळेल.
मुंबई: परतीच्या पावसामुळे पिकांचे प्रचंड नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी काहीप्रमाणात दिलासा दिला आहे. राज्यपालांनी शनिवारी शेतकऱ्यांना प्रतिहेक्टर ८ हजार रुपयांची मदत देणार असल्याचे जाहीर केले. त्यानुसार दोन हेक्टरपर्यंत जमीन असलेल्या शेतकऱ्यांना खरीप पिकांसाठी ही नुकसान भरपाई मिळेल. तर फळबागा आणि बारमाही पिकांच्या नुकसानीसाठी हेक्टरी १८००० रुपये इतकी नुकसान भरपाई मिळणार असल्याचे राजभवनाकडून प्रसिद्ध करण्यात आलेल्या परिपत्रकात म्हटले आहे. याशिवाय, शेतसारा माफ केला जाणार आहे. तसेच ग्रामीण भागातील शाळा आणि महाविद्यालयातील विद्यार्थ्यांना परीक्षा शुल्कातून सूट देण्यात आली आहे
मोठी बातमी: राज्यपालांकडून शेतकऱ्यांना हेक्टरी ८००० रुपयांची मदत जाहीर
दोन हेक्टरपर्यंत जमीन असलेल्या शेतकऱ्यांना खरीप पिकांसाठी ही नुकसान भरपाई मिळेल.
मुंबई: परतीच्या पावसामुळे पिकांचे प्रचंड नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी काहीप्रमाणात दिलासा दिला आहे. राज्यपालांनी शनिवारी शेतकऱ्यांना प्रतिहेक्टर ८ हजार रुपयांची मदत देणार असल्याचे जाहीर केले. त्यानुसार दोन हेक्टरपर्यंत जमीन असलेल्या शेतकऱ्यांना खरीप पिकांसाठी ही नुकसान भरपाई मिळेल. तर फळबागा आणि बारमाही पिकांच्या नुकसानीसाठी हेक्टरी १८००० रुपये इतकी नुकसान भरपाई मिळणार असल्याचे राजभवनाकडून प्रसिद्ध करण्यात आलेल्या परिपत्रकात म्हटले आहे. याशिवाय, शेतसारा माफ केला जाणार आहे. तसेच ग्रामीण भागातील शाळा आणि महाविद्यालयातील विद्यार्थ्यांना परीक्षा शुल्कातून सूट देण्यात आली आहे
पोखरी ग्रामपंचायत प्रभागनिहाय आरक्षण सोडत
मोजे पोखरी येथे दि.18/11/2019 रोजी सकाळी 10.00 वाजता आरक्षण सोडत पद्धतीने प्रभाग नुसार आरक्षण ठरवण्यात येणार आहे. त्यासाठी सर्व नागरिकांनी सकाळी 10.00 वाजता मराठी शाळेजवळ हजर रहावे असे आवाहन प्राधिकृत अधिकारी श्री.बिऱ्हाडे मंडळ अधिकारी साळवा भाग, तलाठी बालाजी लोंढे तसेच ग्रामसेवक श्रीमती पाटील यांनी केले आहे.
जिल्ह्यात भरडधान्य नोंदणी व खरेदीकरीता 15 खरेदी केंद्र सुरु
जळगाव, दि. 15 :- जिल्ह्यात खरीप पणन हंगाम 2019-20 मध्ये केंद्र शासनाच्या आधारभूत किंमत खरेदी योजने अंतर्गत भरडधान्य (ज्वारी, बाजरी व मका) खरेदीकरीता जिल्हाधिकारी डॉ. अविनाश ढाकणे यांनी बिगर आदिवासी क्षेत्रात 15 खरेदी केंद्रांना मंजुरी दिलेली आहे. सदरच्या खरेदी केंद्रावर शेतकऱ्यांनी खरेदीसाठी ऑनलाईन नोंद करावयाची आहे.
त्याकरिता शेतकऱ्यांनी चालु वर्षाचा ऑनलाईन 7/12 उतारा, आधार कार्डची झेरॉक्स व बँक पासबुक किंवा कॅन्सल चेकची झेरॉक्स सादर करावयाची आहे. शेतकरी नोंदणी 1 नोव्हेंबर, 2019 पासून सुरु झालेली असून नोंदणी व खरेदीची अंतिम मुदत 31 डिसेंबर, 2019 पर्यंत आहे.
सन 2019-20 च्या खरीप पणन हंगामात हायब्रीड ज्वारी रुपये 2550/- मालदांडी ज्वारी रु. 2570/-, बाजारी रु. 2000/- व मका रु. 1760/- असा हमीभाव शासनाने निश्चित केलेला असुन सदरचा हमीभाव हा एफ.ए.क्यु. दर्जाच्या धान्याकरिता आहे. ज्यामध्ये न डागाळलेला, स्वच्छ प्रतिचा व 14 टक्क्यापर्यंत आद्रता असलेला माल खरेदी करण्यात येईल.
तरी जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी भरडधान्य खरेदीकरीता ऑनलाईन नोंदणी करावी. असे आवाहन श्री. परिमल साळुंखे, जिल्हा मार्केटिंग अधिकारी, जळगाव यांनी एका प्रसिद्धी पत्रकान्वये केले आहे.
00000
बुरशीयुक्त चारा जनावरांना खाऊ घालताना घ्यावयाची काळजी
बुरशीयुक्त चारा चुन्याची निवळी शिंपडून
त्याची कुट्टी करूनच जनावरांना खाऊ घाला
जिल्हा पशुसंवर्धन उपायुक्त
जळगाव.दि.13, जिल्ह्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे मका,ज्वारी,सोयाबीन, सारख्या पिकांचा अकाली पावसामुळे या पिंकांच्या बडब्यावर ॲस्परजिलस नायगर बुरशीची मोठ्या प्रमाणावर वाढ होते. अश प्रकारच्या बुरशीयुक्त कडब्यात ऑक्झॅलीक ॲसीडचे प्रमाण वाढलेले दिसते. तसेच अतिवृष्टीमुळे कपाशीत वाढणारे पाथरीसारखे बोंडाच्या फुलाचे/फुल गवतामध्ये सुद्धा ॲक्झालिक ॲसीडचे 18 टक्के प्रमाण जास्त असते जनावरांना अशा प्रकारचा जारा खाऊ घातल्यास जनावरांच्या रक्तातील कल्शियम बरोबबर संयांग हाऊन कॅल्शियम ऑक्झॅलेटचे स्फटीक तयार होतात, त्यामुळे शरीरातील कॅल्शियमचे प्रमाण कमी हावून महत्वाचे अवयवाचे कार्य मंदावते किंवा थांबते व जनावरांचा मृत्यु होतो. विषबाधा ही गायी,म्हशी,शेळ्या व मेंढ्या इत्यादि जनावरांमध्ये बुरशीयुक्त चारा खाण्याचे प्रमाणावर अवलंबून असते.
बुरशीयुक्त चारा खाल्याने बाधीत झालेल्या जनावरांमधील आजाराची लक्षणे अशी असतात सौम्य विषबाधा झाल्याची लक्षणे 1 ते 12 महिने सतत सुरशीयुक्त चाऱ्यांच्या संपर्कात असलेल्या जनावरांमध्ये आढळून येवून जनावरांध्ये भुक न मंदावणे, संडास पातळ होणे, जनावरांचे वजन कमी होणे तर लाळ गळणे , जनावरे अशक्त होवून थरथर होणे, पोट फुगणे, श्वासाच्छवास घेण्यासाइी त्रास होणे, अशा परिस्थितीत जनावरे डोके पोटावर ठेवतात,लघवी थेंब-थेंब याप्रमाणे होणे, जनावरांच्या मागील बाजूस जलयुक्त सुज येणे ,बध्दकोष्टता हे लक्षणे तीव्र विषबाधा लक्षणे दिसमन येतात व यामध्ये जनावरे दगावूसुध्दा शकतात.
तरी पशुपालकांनी आपल्या जनावरांना बुरशीयुक्त चारा खाऊ घालण्यापूर्वी त्या चाऱ्यावर चुन्याची निवळी शिंपडून वाळवून कुट्टी करूनच खाऊ घालावा, तथापि योग्य ती काळजी घेवूनसुध्दा जनावरांना बाधा झाल्यास नजिकच्या पशुसंवर्धन दवाखान्याशी संपर्क साधून आपले पशुधन सुरक्षित सुदृढ ठेवण्याचे आवाहन जिल्हा पशुसंवर्धन उपायुक्त,जळगाव यांनी एका प्रसिध्दी पत्रकान्वये केले आहे.
****
त्याची कुट्टी करूनच जनावरांना खाऊ घाला
जिल्हा पशुसंवर्धन उपायुक्त
जळगाव.दि.13, जिल्ह्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे मका,ज्वारी,सोयाबीन, सारख्या पिकांचा अकाली पावसामुळे या पिंकांच्या बडब्यावर ॲस्परजिलस नायगर बुरशीची मोठ्या प्रमाणावर वाढ होते. अश प्रकारच्या बुरशीयुक्त कडब्यात ऑक्झॅलीक ॲसीडचे प्रमाण वाढलेले दिसते. तसेच अतिवृष्टीमुळे कपाशीत वाढणारे पाथरीसारखे बोंडाच्या फुलाचे/फुल गवतामध्ये सुद्धा ॲक्झालिक ॲसीडचे 18 टक्के प्रमाण जास्त असते जनावरांना अशा प्रकारचा जारा खाऊ घातल्यास जनावरांच्या रक्तातील कल्शियम बरोबबर संयांग हाऊन कॅल्शियम ऑक्झॅलेटचे स्फटीक तयार होतात, त्यामुळे शरीरातील कॅल्शियमचे प्रमाण कमी हावून महत्वाचे अवयवाचे कार्य मंदावते किंवा थांबते व जनावरांचा मृत्यु होतो. विषबाधा ही गायी,म्हशी,शेळ्या व मेंढ्या इत्यादि जनावरांमध्ये बुरशीयुक्त चारा खाण्याचे प्रमाणावर अवलंबून असते.
बुरशीयुक्त चारा खाल्याने बाधीत झालेल्या जनावरांमधील आजाराची लक्षणे अशी असतात सौम्य विषबाधा झाल्याची लक्षणे 1 ते 12 महिने सतत सुरशीयुक्त चाऱ्यांच्या संपर्कात असलेल्या जनावरांमध्ये आढळून येवून जनावरांध्ये भुक न मंदावणे, संडास पातळ होणे, जनावरांचे वजन कमी होणे तर लाळ गळणे , जनावरे अशक्त होवून थरथर होणे, पोट फुगणे, श्वासाच्छवास घेण्यासाइी त्रास होणे, अशा परिस्थितीत जनावरे डोके पोटावर ठेवतात,लघवी थेंब-थेंब याप्रमाणे होणे, जनावरांच्या मागील बाजूस जलयुक्त सुज येणे ,बध्दकोष्टता हे लक्षणे तीव्र विषबाधा लक्षणे दिसमन येतात व यामध्ये जनावरे दगावूसुध्दा शकतात.
तरी पशुपालकांनी आपल्या जनावरांना बुरशीयुक्त चारा खाऊ घालण्यापूर्वी त्या चाऱ्यावर चुन्याची निवळी शिंपडून वाळवून कुट्टी करूनच खाऊ घालावा, तथापि योग्य ती काळजी घेवूनसुध्दा जनावरांना बाधा झाल्यास नजिकच्या पशुसंवर्धन दवाखान्याशी संपर्क साधून आपले पशुधन सुरक्षित सुदृढ ठेवण्याचे आवाहन जिल्हा पशुसंवर्धन उपायुक्त,जळगाव यांनी एका प्रसिध्दी पत्रकान्वये केले आहे.
****
पीक नुकसान सूचना फॉर्म
ज्या शेतकऱ्यांनी बँक, सोसायटी,विमा कंपनी, यांचा मार्फत. विमा काढला असेल असा शेतकरी बांधवानी हा फार्म भरून कृषी अधिकारी . कार्यालयात जमा करणे चालू आहे . कार्यालय ठिकाण :- चोपडा रोड वाईट हाऊस समोर धरणगाव .
पीक नुकसान सूचना फॉर्म
पीक नुकसान सूचना फॉर्म
जिल्ह्यात मतमोजणीची तयारी अंतिम टप्यात
तलाठी सजा पाळधी बु.October 22, 2019जिल्हा माहिती कार्यालय, मतमोजणी, विधानसभा निवडणूक 2019
No comments

मतमोजणीसाठी 1254 अधिकारी, कर्मचारी कार्यरत राहणार
• जळगाव शहर मतदार संघाची मतमोजणी 26 फेऱ्यांमध्ये तर एरंडोलची 21 फेऱ्यांमध्ये पूर्ण होणार
जळगाव, दि. 22 - महाराष्ट्र विधानसभा सार्वत्रिक निवडणूक-2019 साठी 21 ऑक्टोबर रोजी मतदान घेण्यात आले. जिल्ह्यातील अकरा विधानसभा क्षेत्रात सरासरी 60.90 टक्के इतके मतदान झाले असून मतमोजणी येत्या 24 ऑक्टोबर रोजी संबंधित तालुक्याच्या ठिकाणी होणार आहे. या मतमोजणीसाठी जिल्हा प्रशासनाने आवश्यक ती सर्व तयारी पूर्ण केली असून याकरीता 1254 अधिकारी, कर्मचारी यांची नेमणूक केली आहे. अशी माहिती जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी डॉ. अविनाश ढाकणे यांनी दिली.
जिल्ह्यात विधानसभेचे अकरा मतदार संघ असून या मतदार संघाची मतमोजणी 24 ऑक्टोबर रोजी सकाळी 8.00 वाजता संबंधित मतदार संघाचे निवडणूक निरिक्षक, निवडणूक निर्णय अधिकारी, स्क्षूम निरिक्षक यांच्या उपस्थितीत होणार आहे. प्रत्येक मतदार संघाची मतमोजणी त्या त्याठिकाणी एकाचवेळी 14 टेबलवर सुरु करण्यात येणार आहे. एकावेळी 14 मतदान केंद्राची मतमोजणी होणार आहे. या मतमोजणीसाठी जिल्ह्यात 176 मतमोजणी सुपरवायझर, 176 मतमोजणी सहायक, 33 रो अधिकारी, 44 सुविधा कर्मचारी, 88 टॅबुलेशन कर्मचारी, 11 मिडीया को ऑडिनेशन, 55 पोस्टल मतमोजणी सुपरवायझर, 55 पोस्टल मतमोजणी सहायक, 220 स्क्षुम निरिक्षक व इतर कर्मचारी कार्यरत राहणार आहे. प्रत्येक मतदार संघासाठी एक मतमोजणी निरीक्षक, त्यांच्या अधिनस्त सूक्ष्म निरीक्षकही मतमोजणीवर लक्ष ठेवून असणार आहे.
सकाळी 8 वा सर्वप्रथम पोस्टल मतमोजणीने सुरवात होणार असून त्यानंतर मतदान केंद्रनिहाय ईव्हीएमची मतमोजणी करण्यात येणार आहे. मतमोजणी पूर्ण झाल्यानंतर एका निश्चित केलेल्या टेबलवर रँडमली निवड केलेल्या पाच व्हीव्हीपॅटमधील चिठ्यांचीही मतमोजणी करण्यात येणार आहे. याकरीता 10 टक्के कर्मचारी राखीव ठेवण्यात आले आहे. मतमोजणीसाठी प्रत्येक टेबलवर एक पर्यवेक्षक, सहायक, सूक्ष्म निरीक्षक, शिपाई याप्रमाणे कर्मचारी असणार आहे.
विधानसभा क्षेत्रनिहाय मतमोजणी होणार असलेल्या फेऱ्या- चोपडा विधानसभा मतदार संघ 23 फेऱ्या, रावेर 22 फेऱ्या, भुसावळ 22 फेऱ्या, जळगाव शहर 26 फेऱ्या, जळगाव ग्रामीण 23 फेऱ्या, अमळनेर 23 फेऱ्या, एरंडोल 21 फेऱ्या, चाळीसगाव 24 फेऱ्या, पाचोरा 23 फेऱ्या, जामनेर 23 फेऱ्या, मुक्ताईनगर 23 फेऱ्यांमध्ये मतमोजणी पूर्ण होणार आहे.
विधानसभा क्षेत्रनिहाय मतमोजणी होणार असलेली ठिकाणे - चोपडा- महाराष्ट्र वखार महामंडळ, गोडवून क्रमांक 2, चोपडा, रावेर - नवीन प्रशासकीय इमारत, तहसील कार्यालय, रावेर, भुसावळ- प्रशासकीय इमार, प्रभाकर हॉलसमोर, भुसावळ, जळगाव शहर- महाराष्ट्र वखार महामंडळाचे गोडवून क्रमांक 26, जळगाव, जळगाव ग्रामीण- महाराष्ट्र वखार महामंडळ, गोडवून क्रमांक 2, धरणगाव, अमळनेर- छत्रपती शिवाजी महाराज क्रीडा संकुल, प्रताप कॉलेज, अमळनेर, एरंडोल- डीडीएसपी कॉलेज, तरणतलावाजवळ, म्हसावद रोड, एरंडोल, चाळीसगाव- वायएन चव्हाण महाविद्यालय, हिरापूर रोड, चाळीसगाव, पाचोरा-गिरणाई क्रेडिट सोसायटी गोडावून क्रमांक 3, मोंढाळा रोड, पाचोरा, जामनेर- शासकीय खाद्यनिगम गोडवून क्रमांक 3, मार्केट कमिटीच्या पश्चिम बाजूला, जामनेर, मुक्ताईनगर-श्री संत मुक्ताबाई महाविद्यालय इनडोअर स्टेडियम, मुक्ताईनगर येथे होणार आहे.
मतमोजणीसाठी नेमण्यात आलेल्या पर्यवेक्षक व सहाय्यक यांचे पहिले प्रशिक्षण पूर्ण झाले असून दुसरे प्रशिक्षण आज (23 ऑक्टोबर) होणार आहे. प्रशिक्षणानंतर मतमोजणीसाठी नेमण्यात आलेल्या अधिकारी, कर्मचारी यांची सरमिसळ करुन कोणाला कोणत्या मतदार संघात मतमोजणीसाठी पाठविण्याचे याचे आदेश संबंधितांना देवून त्यांना लगेचच मतमोजणी केंद्राकडे रवाना करण्यात येणार असल्याची माहिती उप जिल्हा निवडणूक अधिकारी तुकाराम हुलवळे यांनी दिली आहे.
मतमोजणी सुरळीत व शांततेत पार पाडण्यासाठी सर्व मतदानकेंद्राच्या परिसरात पोलीस अधिक्षक डॉ. पंजाबराव उगले यांच्या नेतृत्वाखाली चोख पोलीस बंदोबस्ताचे नियोजन करण्यात आले आहे.
000