आजचा माझा अनुभव :
२६.०९.२०१९ ला दुपारी ०१.३० वाजताच्या सुमारास विवरे शिवार ता. धरणगाव येथे ४ महिला व १ पुरुष
मृतकांची नांवे
रघुनाथ दशरथ पाटील
वय ६७
अलकाबाई रघुनाथ पाटील
वय ६०
शोभाबाई भागवत पाटील वय५०
कल्पना शामकांत पाटील
वय ३५
लताबाई उदय पाटील
वय ३२
विज पडून जागेवरच मृत्युमुखी पडले.घटनेची सूचना महेंद्र पाटील कोतवाल विवरे यांनी देताच लगेचच वीरेंद्र सोनकांबळे तलाठी विवरे,पी एल बाविस्कर मंडळ अधिकारी धरणगाव यांनी घटनेचा पंचनामा करून आणला. मा.पवन देसले सर सहाय्यक पोलीस निरीक्षक धरणगाव यांनी घटनास्थळी तात्काळ भेट देऊन पंचनामा करून गावकऱ्यांच्या मदतीने मृतांना शवविच्छेदनासाठी ग्रामीण रुग्णालय धरणगाव येथे आणले.विधानसभा निवडणुकीचा ताण असताना सुद्धा २४ तासाच्या आत वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली पंकज शिंदे लिपिक त.का.धरणगाव यांनी सदर चेक संदर्भात देयक तयार केले.मा.अविनाश ढाकणे सर जिल्हाधिकारी जळगाव यांच्या सूचनेनुसार लगेचच सर्व प्रक्रिया पार पाडून २७.०९.२०१९
दुपारी ०५.०० वाजता मा.विनय गोसावी सर प्रांताधिकारी एरंडोल भाग, एरंडोल व मा. नितीन देवरे सर तहसीलदार धरणगाव यांनी मृतांच्या वारसांना प्रत्येकी ४ लाख अशी एकूण २० लाख रुपयांची शासकीय मदत घरी जाऊन दिली .मृतकांना श्रद्धांजली देण्यात आली .
या प्रसंगी संपूर्ण गावकरी अत्यंत भावुक झाले होते .जरी आकस्मिक मृत्यूनंतर आप्तेष्टांचा अनमोल जीव परत येत नसला तरी सुद्धा शासन कुटुंबीयांच्या खंबीरपणे पाठीशी आहे याची गावकऱ्यांना व समाजाला प्रचिती आली.
यंदाच्या पावसाळ्यातील वीज पडून एकाच कुटुंबातील ५ व्यक्तींचा दुर्दैवी मृत्यू होण्याची बहुधा ही राज्यातील पहिलीच वेळ असावी .शासनाने केलेल्या आर्थिक मदतीपेक्षा ही त्यामागे असलेला शासनाचा पाठीराखा असल्याचा उद्देश असतो.या उद्देशासाठी संपूर्ण शासकीय यंत्रणा सतत झटत असते .
मला तर अभिमान वाटतो अशा संवेदनशील व प्रगल्भ वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली व सहकाऱ्यांच्या साथीने शासकीय नोकरीमध्ये वाटचाल करताना ....
**मृतांना भावपूर्ण श्रद्धांजली**
प्रथमेश मोहोड
निवडणुक नायब तहसीलदार धरणगाव
No comments:
Post a Comment